शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरण उत्सव ठरावा; प्राचार्य किशोर पवार यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:26 IST

नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील जाणकार प्रा. डॉ. किशोर पवार यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरण उत्सव व्हायला हवा असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकृत्रिम तलावाचा सर्वोत्तम पर्यायजल, ध्वनी आणि वायु प्रदुषण टाळणे महत्वाचे

नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील जाणकार प्रा. डॉ. किशोर पवार यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरण उत्सव व्हायला हवा असेही ते म्हणाले.प्रश्न: गणेश विसर्जन काळात कोणत्या बाबींवर भर द्यायला हवा?पवार: गणेशोत्सव विसर्जन काळात प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्या वेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते. त्यामुळे मुळात अशा मूर्ती आणूच नये आणि आणलेल्या असल्यास किमान त्यांचे विसर्जन करू नये. त्याऐवजी प्रातिनिधिक स्वरूपातील शाडू मातीच्या छोट्या मूर्तींचे विसर्जन करावे. तसेच सजावटीसाठी विघटनशील नसलेल्या कोणत्याही घटकाचा वापर केलेला असल्यास त्या साहित्याचेदेखील विसर्जन नदी, विहीर किंवा नैसर्गिक तलावात करू नये. त्याऐवजी आता प्रशासनाकडून दिला जाणारा कृत्रिम तलाव हाच सर्वोत्तम पर्याय आहे.प्रश्न: जलप्रदूषणाशिवाय अन्य कोणत्या प्रदूषणाबाबत विशेष काळजी घ्यायला हवी?पवार: गणेश विसर्जन केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्याची होणारी दशा अत्यंत विदारक असते. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि वाढते नदी प्रदूषण व त्याचे होणारे परिणाम या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ध्यास प्रत्येकाने घ्यायला हवा. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणावर होते. ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी ढोल-ताशा पथक व स्पीकरवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. ध्वनिक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांमुळे होणाºया ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन ध्वनिप्रदूषणाबाबतही अत्यंत सजग बनण्याची गरज आहे.प्रश्न: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय करणे आवश्यक आहे?पवार: गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा करीत असताना तो पर्यावरणपूरक आणि पर्यावरण अनुकूल कसा होईल, या विचाराला प्राधान्य द्यायला हवे. या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून आपण त्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन काळात आपण करीत असलेली कोणतीही कृती ही पर्यावरणाला बाधा आणणारी नाही ना? एवढा विचार प्रत्येक मंडळाने आणि सामान्य नागरिकांनी केला तरी बहुतांश समस्या सुटू शकेल, असे मला वाटते.मुलाखत: धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकGanesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण