शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

नाशिकचा गणेशोत्सव पर्यावरण उत्सव ठरावा; प्राचार्य किशोर पवार यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 00:26 IST

नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील जाणकार प्रा. डॉ. किशोर पवार यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरण उत्सव व्हायला हवा असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देकृत्रिम तलावाचा सर्वोत्तम पर्यायजल, ध्वनी आणि वायु प्रदुषण टाळणे महत्वाचे

नाशिक- अत्यंत मंगलमय वातावरणात, सुरक्षाविषयक सर्व प्रकारची काळजी घेत ध्वनी प्रदूषणविषयक सर्व कायदे काटेकोरपणे पाळत आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जलप्रदूषणाला पूर्णपणे रोखण्याच्या निर्धाराने यंदाचा गणेश विसर्जन सोहळा व्हावा, हीच आजच्या काळाची गरज आहे, असे मत पर्यावरण क्षेत्रातील जाणकार प्रा. डॉ. किशोर पवार यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरण उत्सव व्हायला हवा असेही ते म्हणाले.प्रश्न: गणेश विसर्जन काळात कोणत्या बाबींवर भर द्यायला हवा?पवार: गणेशोत्सव विसर्जन काळात प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती, तसेच मोठ्या आकाराच्या मूर्तींमुळे विसर्जनाच्या वेळी होणारे पाण्याचे प्रदूषण जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करणारे असते. त्यामुळे मुळात अशा मूर्ती आणूच नये आणि आणलेल्या असल्यास किमान त्यांचे विसर्जन करू नये. त्याऐवजी प्रातिनिधिक स्वरूपातील शाडू मातीच्या छोट्या मूर्तींचे विसर्जन करावे. तसेच सजावटीसाठी विघटनशील नसलेल्या कोणत्याही घटकाचा वापर केलेला असल्यास त्या साहित्याचेदेखील विसर्जन नदी, विहीर किंवा नैसर्गिक तलावात करू नये. त्याऐवजी आता प्रशासनाकडून दिला जाणारा कृत्रिम तलाव हाच सर्वोत्तम पर्याय आहे.प्रश्न: जलप्रदूषणाशिवाय अन्य कोणत्या प्रदूषणाबाबत विशेष काळजी घ्यायला हवी?पवार: गणेश विसर्जन केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्याची होणारी दशा अत्यंत विदारक असते. वाढते प्रदूषण, जागतिक तापमानवाढ आणि वाढते नदी प्रदूषण व त्याचे होणारे परिणाम या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा ध्यास प्रत्येकाने घ्यायला हवा. गणेशोत्सवाच्या काळात ध्वनीप्रदूषणदेखील मोठ्या प्रमाणावर होते. ध्वनिप्रदूषण थांबवण्यासाठी ढोल-ताशा पथक व स्पीकरवर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. ध्वनिक्षेपक आणि डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील वाद्यांमुळे होणाºया ध्वनीप्रदूषणाने मानवी आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतात. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन ध्वनिप्रदूषणाबाबतही अत्यंत सजग बनण्याची गरज आहे.प्रश्न: पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी काय करणे आवश्यक आहे?पवार: गणेशोत्सव घरगुती आणि सार्वजनिक स्वरूपात साजरा करीत असताना तो पर्यावरणपूरक आणि पर्यावरण अनुकूल कसा होईल, या विचाराला प्राधान्य द्यायला हवे. या कालावधीत पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाची काळजी घेतली जाईल, हे पाहणे आपल्या सर्वांचे नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे समजून आपण त्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन काळात आपण करीत असलेली कोणतीही कृती ही पर्यावरणाला बाधा आणणारी नाही ना? एवढा विचार प्रत्येक मंडळाने आणि सामान्य नागरिकांनी केला तरी बहुतांश समस्या सुटू शकेल, असे मला वाटते.मुलाखत: धनंजय रिसोडकर

टॅग्स :NashikनाशिकGanesh Mahotsavगणेशोत्सवenvironmentपर्यावरण