शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:17 IST

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. नाशिक जिल्हा राज्यात कसा शुद्ध पाण्याचा जिल्हा आहे हे सांगण्याची धडपड जिल्हा परिषदेकडून सातत्याने होत आहे. अगदी कालपर्वापर्यंत ऐन कडाक्याच्या ऊन्हात आणखी काही गावांची नावे जाहि करून येथे जणू पाण्याच प्रश्नच नाही असे भासविण्यात आले. ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताची आणि दुषित पाणीपुरवठ्याची तक्रार आहे अशा गावांमध्ये सर्व उपायोजना करून पाणी सुरक्षित करण्यात आल्याचेही जाहिर करण्यात आले. वास्तविक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असल्याचे जाहिर केलेले असतांना जिल्हा परिषदेचा स्वच्छ पाण्यासाठीचा आटापिटा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे आणि शुद्ध पाण्यासाठी मुळात पुरेसे पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु पाण्याचा ठणाणा असतांनाही सर्वकसे ‘सुजलाम सुफलाम’ आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यामागची भुमिका स्पष्ट केली जात नसली तरी ती स्पष्ट होतच नाही असे आजिबातच नाही.जिल्हयातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबतचा छातीठोक दावा केवळ प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारावर नव्हे तर मानगुटीवर बसू ते कागदे रंगविली गेली त्यातून आला असे म्हणण्यासारखी परिस्थिी समोर आलेली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची असल्याने नियमित पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देशही आहेत. पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ही माहिती अपलोड होणार असल्याने शुद्धतेचे आणि टंचाईमुक्तीचे दावे करण्यात येस आहेत. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील ३५ गावे, ४ वाड्या - २८ टॅँकर, चांदवड तालुका १० गावे, १७ वाड्या- ८ टॅँकर, देवळा ९ गावे, १६ वाड्या- ७ टॅँकर, मालेगाव २२ गाव, ७५ वाड्या- ३२ टॅँकर, नांदगाव १६ गावे, १३८ वाड्या- ३१ टॅँकर, सुरगाणा ५ गावे, १ वाडी- ३ टॅँकर, सिन्नर १७ गावे, १६ वाड्या- ४४ टॅँकर, येवला ५० गाव, ३० वाड्या - ३१ टॅँकर असे नाशिक जिह्यात एकूण १३४ गावे व ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक जास्त ४४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याला काय उत्तर देणार प्रत्यक्षात पाणी मिळविण्यासाठी जेथे धडपड सुरू आहे तेथे स्त्रोताचे शुद्धीकरण आणि स्वच्छ पाण्याचा दावा खरा कसा मानावा.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी