शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:17 IST

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. नाशिक जिल्हा राज्यात कसा शुद्ध पाण्याचा जिल्हा आहे हे सांगण्याची धडपड जिल्हा परिषदेकडून सातत्याने होत आहे. अगदी कालपर्वापर्यंत ऐन कडाक्याच्या ऊन्हात आणखी काही गावांची नावे जाहि करून येथे जणू पाण्याच प्रश्नच नाही असे भासविण्यात आले. ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताची आणि दुषित पाणीपुरवठ्याची तक्रार आहे अशा गावांमध्ये सर्व उपायोजना करून पाणी सुरक्षित करण्यात आल्याचेही जाहिर करण्यात आले. वास्तविक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असल्याचे जाहिर केलेले असतांना जिल्हा परिषदेचा स्वच्छ पाण्यासाठीचा आटापिटा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे आणि शुद्ध पाण्यासाठी मुळात पुरेसे पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु पाण्याचा ठणाणा असतांनाही सर्वकसे ‘सुजलाम सुफलाम’ आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यामागची भुमिका स्पष्ट केली जात नसली तरी ती स्पष्ट होतच नाही असे आजिबातच नाही.जिल्हयातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबतचा छातीठोक दावा केवळ प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारावर नव्हे तर मानगुटीवर बसू ते कागदे रंगविली गेली त्यातून आला असे म्हणण्यासारखी परिस्थिी समोर आलेली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची असल्याने नियमित पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देशही आहेत. पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ही माहिती अपलोड होणार असल्याने शुद्धतेचे आणि टंचाईमुक्तीचे दावे करण्यात येस आहेत. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील ३५ गावे, ४ वाड्या - २८ टॅँकर, चांदवड तालुका १० गावे, १७ वाड्या- ८ टॅँकर, देवळा ९ गावे, १६ वाड्या- ७ टॅँकर, मालेगाव २२ गाव, ७५ वाड्या- ३२ टॅँकर, नांदगाव १६ गावे, १३८ वाड्या- ३१ टॅँकर, सुरगाणा ५ गावे, १ वाडी- ३ टॅँकर, सिन्नर १७ गावे, १६ वाड्या- ४४ टॅँकर, येवला ५० गाव, ३० वाड्या - ३१ टॅँकर असे नाशिक जिह्यात एकूण १३४ गावे व ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक जास्त ४४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याला काय उत्तर देणार प्रत्यक्षात पाणी मिळविण्यासाठी जेथे धडपड सुरू आहे तेथे स्त्रोताचे शुद्धीकरण आणि स्वच्छ पाण्याचा दावा खरा कसा मानावा.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी