शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:17 IST

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. नाशिक जिल्हा राज्यात कसा शुद्ध पाण्याचा जिल्हा आहे हे सांगण्याची धडपड जिल्हा परिषदेकडून सातत्याने होत आहे. अगदी कालपर्वापर्यंत ऐन कडाक्याच्या ऊन्हात आणखी काही गावांची नावे जाहि करून येथे जणू पाण्याच प्रश्नच नाही असे भासविण्यात आले. ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताची आणि दुषित पाणीपुरवठ्याची तक्रार आहे अशा गावांमध्ये सर्व उपायोजना करून पाणी सुरक्षित करण्यात आल्याचेही जाहिर करण्यात आले. वास्तविक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असल्याचे जाहिर केलेले असतांना जिल्हा परिषदेचा स्वच्छ पाण्यासाठीचा आटापिटा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे आणि शुद्ध पाण्यासाठी मुळात पुरेसे पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु पाण्याचा ठणाणा असतांनाही सर्वकसे ‘सुजलाम सुफलाम’ आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यामागची भुमिका स्पष्ट केली जात नसली तरी ती स्पष्ट होतच नाही असे आजिबातच नाही.जिल्हयातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबतचा छातीठोक दावा केवळ प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारावर नव्हे तर मानगुटीवर बसू ते कागदे रंगविली गेली त्यातून आला असे म्हणण्यासारखी परिस्थिी समोर आलेली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची असल्याने नियमित पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देशही आहेत. पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ही माहिती अपलोड होणार असल्याने शुद्धतेचे आणि टंचाईमुक्तीचे दावे करण्यात येस आहेत. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील ३५ गावे, ४ वाड्या - २८ टॅँकर, चांदवड तालुका १० गावे, १७ वाड्या- ८ टॅँकर, देवळा ९ गावे, १६ वाड्या- ७ टॅँकर, मालेगाव २२ गाव, ७५ वाड्या- ३२ टॅँकर, नांदगाव १६ गावे, १३८ वाड्या- ३१ टॅँकर, सुरगाणा ५ गावे, १ वाडी- ३ टॅँकर, सिन्नर १७ गावे, १६ वाड्या- ४४ टॅँकर, येवला ५० गाव, ३० वाड्या - ३१ टॅँकर असे नाशिक जिह्यात एकूण १३४ गावे व ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक जास्त ४४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याला काय उत्तर देणार प्रत्यक्षात पाणी मिळविण्यासाठी जेथे धडपड सुरू आहे तेथे स्त्रोताचे शुद्धीकरण आणि स्वच्छ पाण्याचा दावा खरा कसा मानावा.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी