शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धतेसाठी जल असायला तर हवे (विश्लेषण)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 16:17 IST

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. ...

नाशिक जिल्ह्यातील गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत हे सुरक्षित तर पाणीपुरवठा स्वच्छ असल्याचे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेकडून जाहिर केले जात आहे. नाशिक जिल्हा राज्यात कसा शुद्ध पाण्याचा जिल्हा आहे हे सांगण्याची धडपड जिल्हा परिषदेकडून सातत्याने होत आहे. अगदी कालपर्वापर्यंत ऐन कडाक्याच्या ऊन्हात आणखी काही गावांची नावे जाहि करून येथे जणू पाण्याच प्रश्नच नाही असे भासविण्यात आले. ज्या ठिकाणी पाण्याच्या स्त्रोताची आणि दुषित पाणीपुरवठ्याची तक्रार आहे अशा गावांमध्ये सर्व उपायोजना करून पाणी सुरक्षित करण्यात आल्याचेही जाहिर करण्यात आले. वास्तविक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची टंचाई असल्याचे जाहिर केलेले असतांना जिल्हा परिषदेचा स्वच्छ पाण्यासाठीचा आटापिटा कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे आणि शुद्ध पाण्यासाठी मुळात पुरेसे पाणी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. परंतु पाण्याचा ठणाणा असतांनाही सर्वकसे ‘सुजलाम सुफलाम’ आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करण्यामागची भुमिका स्पष्ट केली जात नसली तरी ती स्पष्ट होतच नाही असे आजिबातच नाही.जिल्हयातील पाणीपुरवठा आणि स्वच्छतेबाबतचा छातीठोक दावा केवळ प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारावर नव्हे तर मानगुटीवर बसू ते कागदे रंगविली गेली त्यातून आला असे म्हणण्यासारखी परिस्थिी समोर आलेली आहे. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचा पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची असल्याने नियमित पाणी शुद्धीकरणाकडे लक्ष देण्याचे निर्देशही आहेत. पाणी व स्वच्छता विभागा अंतर्गत शासनाने तयार केलेल्या संकेतस्थळावर ही माहिती अपलोड होणार असल्याने शुद्धतेचे आणि टंचाईमुक्तीचे दावे करण्यात येस आहेत. दुसरीकडे बागलाण तालुक्यातील ३५ गावे, ४ वाड्या - २८ टॅँकर, चांदवड तालुका १० गावे, १७ वाड्या- ८ टॅँकर, देवळा ९ गावे, १६ वाड्या- ७ टॅँकर, मालेगाव २२ गाव, ७५ वाड्या- ३२ टॅँकर, नांदगाव १६ गावे, १३८ वाड्या- ३१ टॅँकर, सुरगाणा ५ गावे, १ वाडी- ३ टॅँकर, सिन्नर १७ गावे, १६ वाड्या- ४४ टॅँकर, येवला ५० गाव, ३० वाड्या - ३१ टॅँकर असे नाशिक जिह्यात एकूण १३४ गावे व ४९७ वाड्यांमध्ये १८४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सिन्नर तालुक्यात सर्वाधिक जास्त ४४ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. याला काय उत्तर देणार प्रत्यक्षात पाणी मिळविण्यासाठी जेथे धडपड सुरू आहे तेथे स्त्रोताचे शुद्धीकरण आणि स्वच्छ पाण्याचा दावा खरा कसा मानावा.

टॅग्स :NashikनाशिकWaterपाणी