शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:08 IST

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के ...

ठळक मुद्देप्राथमिक अंदाज : ५० टक्के पिके आडवी; सात तालुके सर्वाधिक बाधित

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत. लागवडीखालील द्राक्षबागांपैकी सुमारे ७० टक्के द्राक्ष जमीनदोस्त झाली आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला जुंपली असून, पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. परतीच्या पावसामुळे पंधरा तालुक्यांपैकी सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा या जिल्ह्यातील पूर्व तालुक्यांमधील पिकांना चांगलाच फटका बसला आहे.त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झालेले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान हे बागलाण, निफाड, दिंडोरी, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले आहे. द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक शेतकऱ्यांच्या बागा या जमीनदोस्त झाल्या असल्याचेही दिसून आले.जिल्ह्यात यावर्षी लागवडीखालील क्षेत्र ७.४० लाख हेक्टर इतके होते. परतीच्या पावसामुळे सुमारे ३.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे म्हणजेच जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये द्राक्ष आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. पीकनिहाय नुकसानीचा अंदाज पाहिला तर ६० हजार हेक्टरवर लावण्यात आलेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. द्राक्षांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस