शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

परतीच्या पावसामुळे द्राक्ष पिकाचे सर्वाधिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 19:08 IST

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के ...

ठळक मुद्देप्राथमिक अंदाज : ५० टक्के पिके आडवी; सात तालुके सर्वाधिक बाधित

नाशिक : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील पिकांना मोठा फटका बसला असून, लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी ३.२६ लाख हेक्टरवरील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. द्राक्ष आणि मका या पिकांना सर्वाधिक फटका बसला असून, इतर पिकेही संकटात आली आहेत. लागवडीखालील द्राक्षबागांपैकी सुमारे ७० टक्के द्राक्ष जमीनदोस्त झाली आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. जिल्हा प्रशासन यंत्रणा पंचनाम्याच्या कामाला जुंपली असून, पीक नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. परतीच्या पावसामुळे पंधरा तालुक्यांपैकी सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा या जिल्ह्यातील पूर्व तालुक्यांमधील पिकांना चांगलाच फटका बसला आहे.त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झालेले आहे. मात्र सर्वाधिक नुकसान हे बागलाण, निफाड, दिंडोरी, चांदवड, मालेगाव, नांदगाव, येवला, सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले आहे. द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या भागात अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत अनेक शेतकऱ्यांच्या बागा या जमीनदोस्त झाल्या असल्याचेही दिसून आले.जिल्ह्यात यावर्षी लागवडीखालील क्षेत्र ७.४० लाख हेक्टर इतके होते. परतीच्या पावसामुळे सुमारे ३.२६ लाख हेक्टरवरील पिकांचे म्हणजेच जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाले असून, यामध्ये द्राक्ष आणि मका पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे. पीकनिहाय नुकसानीचा अंदाज पाहिला तर ६० हजार हेक्टरवर लावण्यात आलेल्या द्राक्षबागा जमीनदोस्त झालेल्या आहेत. द्राक्षांचे सुमारे ७० टक्के नुकसान झाले

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस