शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

...अखेर ४३० शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:11 IST

स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देदोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र प्रलंबित नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली

नाशिक : स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी  जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या स्थायित्व प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र अजूनही प्रलंबित आहे.सन २००५ नंतर शिक्षक म्हणून असलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे तितके गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे गटशिक्षण स्तरावरच स्थायित्व प्रमाणपत्राची प्रकरणे पडून आहेत. बदलीच्या मागणीसाठी आॅफलाइन प्रकरणे सादर करीत असताना स्थायित्व प्रमाणपत्राची अडचण निर्माण होत नव्हती; परंतु बदलीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करताना स्थायित्व प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे त्यांचे अर्ज दाखल होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने स्थायित्व प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षक संघाने  शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते.या प्रस्तावाची फाइल शिक्षणाधिकाऱ्यानी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे  ठेवली होती, तर आंतरजिल्हा बदलीचे अर्ज दाखल करण्याची तारीखही २१ फेब्रुवारी अंतिम असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर स्वाक्षरी केल्याने ४३० शिक्षकांना अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.--इन्फो--काही तालुक्यांमधील शिक्षक वंचित४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असले तरी यातून नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, मालेगाव येथील शिक्षकांना मात्र स्थायित्व प्रमाणपत्र मिळू शकले नाही. तेथील गट शिक्षणाधिकाऱ्यानी प्रस्तावच सादर केले नसल्यामुळे या तालुक्यांतील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा