शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

...अखेर ४३० शिक्षकांना मिळाले स्थायित्व प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 21:11 IST

स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देदोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र प्रलंबित नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली

नाशिक : स्थायित्व प्रमाणपत्राच्या अडकलेल्या फाइल्सवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  स्वाक्षरी केल्याने अखेर ४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असून, या शिक्षकांना आता आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाइन अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी  जिल्ह्यातील सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त शिक्षकांच्या स्थायित्व प्रमाणपत्राचा मुद्दा मात्र अजूनही प्रलंबित आहे.सन २००५ नंतर शिक्षक म्हणून असलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेकडून स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र या मागणीकडे तितके गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे गटशिक्षण स्तरावरच स्थायित्व प्रमाणपत्राची प्रकरणे पडून आहेत. बदलीच्या मागणीसाठी आॅफलाइन प्रकरणे सादर करीत असताना स्थायित्व प्रमाणपत्राची अडचण निर्माण होत नव्हती; परंतु बदलीसाठी आॅनलाइन अर्ज दाखल करताना स्थायित्व प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे त्यांचे अर्ज दाखल होण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने स्थायित्व प्रमाणपत्रासाठी महाराष्ट्र  राज्य प्राथमिक शिक्षक संघाने  शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले होते.या प्रस्तावाची फाइल शिक्षणाधिकाऱ्यानी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे  ठेवली होती, तर आंतरजिल्हा बदलीचे अर्ज दाखल करण्याची तारीखही २१ फेब्रुवारी अंतिम असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने त्यावर स्वाक्षरी केल्याने ४३० शिक्षकांना अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.--इन्फो--काही तालुक्यांमधील शिक्षक वंचित४३० शिक्षकांना स्थायित्व प्रमाणपत्र मिळाले असले तरी यातून नाशिकमधून दोनच शिक्षकांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत. कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, बागलाण, मालेगाव येथील शिक्षकांना मात्र स्थायित्व प्रमाणपत्र मिळू शकले नाही. तेथील गट शिक्षणाधिकाऱ्यानी प्रस्तावच सादर केले नसल्यामुळे या तालुक्यांतील शिक्षकांवर अन्याय झाल्याची भावना शिक्षकांमध्ये आहे.

टॅग्स :NashikनाशिकTeacherशिक्षकSchoolशाळा