शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अक्षयतृतीयेनिमित्त घरोघरी झाले 'कराकेळी' पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 17:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षयतृतीया हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा सण मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षयतृतीया हा भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा सण मानला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या दिवशी असून, यानिमित्त रविवारी (दि.२६) घरोघरी पूर्वजांच्या स्मरणार्थ कराकेळीचे पूजन करण्यात आले. लॉकडाउनमुळे सर्व बाजारपेठ बंद असली तरी सकाळी काही ठिकाणी रस्त्यालगत विक्रेत्यांकडे कराकेळी व आंबे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.अक्षयतृतीया सणाला पूर्वजांना आमरस व पुरणपोळीचा नैवेद्य (घास ) दाखविण्याची प्रथा असल्याने बाजारात काही ठिकाणी आंबे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. यंदा बाजारात आंब्याची आवक कमी असल्याने दर जास्त होते. हापूस आंब्याचा दर ३०० ते ४०० रुपये किलो, तर बदाम आंब्याचा दर १५० ते १८० रुपये किलो असा होता. अक्षयतृतीयेला कराकेळी म्हणजेच मातीच्या भांड्यांची पूजा करण्याची प्रथा असली तरी यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्याची खरेदी शक्य नसल्यास घरातील पितळी किंवा तांब्याच्या कलशाची पूजा करता येईल, असे ब्रह्मवृंदानी सांगितले. याकडे दुर्लक्ष करीत नागरिक मातीचे भांडे खरेदीसाठी बाहेर पडले.दरम्यान, अक्षयतृतीया या सणाला नवीन कपडे, सोने खरेदीची प्रथा आहे. परंतु यंदा कोरोनामुळे सर्व दुकाने बंद असल्याने केवळ घरच्या घरीच पूर्वजांच्या स्मरणासाठी कलश पूजन करण्यात आले. कराकेळी पूजन म्हणजे मातीच्या कलशावर डांगर (खरबूज) ठेवण्यात येते, त्यात पाणी भरून हळदी-कुंकू लावून पूजन करण्यात येते. अक्षयतृतीया हा सण खान्देशात तसेच बागलाण, कळवण, सटाणा, मालेगाव या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. या सणाला या प्रांतात दिवाळीप्रमाणे महत्त्व असल्याने लेकी माहेरी येतात. या सणाला आखाजीचा सण, असेही म्हणतात. मुली ‘आखाजीचा सण मोलाचा देखाजी’ अशी गाणी गातात. तसेच झोके खेळतात. कालानुरूप आता अनेक प्रथा लोप पावत चालल्या आहेत.अक्षयतृतीयेच्या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ ‘अक्षय्य’ मिळते, असे मानले जाते. तसेच या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला ‘अक्षयतृतीया’ असे म्हटले आहे. हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय होते. या दिवशी नवीन घरात प्रवेश, नवीन वस्तू घेणे, मोठे आर्थिक व्यवहार करणे, नवीन वस्त्र, दागिने विकत घेणे, नवीन वाहन खरेदी अशा गोष्टी केल्या जातात. परंतु लॉकडाउनमुळे बाजारपेठ बंद असल्याने या गोष्टी शक्य झाल्या नाहीत.

टॅग्स :NashikनाशिकMarketबाजार