शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विद्यार्थ्यांच्या शुल्क माफीसाठी एआयएसएफ रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 17:15 IST

विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी आणि शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत एआयएसएफने सरकारविरोधात घोषणाबाजीसह आंदोलन केले

ठळक मुद्देआंदोलन : गळती थांबविण्यात सरकार अफयशी ठरल्याचा आरोप दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत.

लोकमत न्यूज नेटवर्क:नाशिक : कोरोना काळातील शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संपूर्ण शुल्क माफी करावे तसेच फ्री शिप पूर्ववत करण्यासह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया स्टूडंट फेडरेशनतर्फे सोमवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.       गतवर्षीपासून कोविड-१९ मुळे विद्यापीठ व महाविद्यालयांचे कॅम्पस ठप्प पडले असून ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थी 'डिजिटल डिव्हाईड' चे बळी ठरत आहेत. अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात जोडण्यासाठी आणि शिक्षणातील गळती थांबविण्यासाठी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत एआयएसएफने सरकारविरोधात घोषणाबाजीसह आंदोलन केले. तसेच शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात अन्यथा ५ जुलैला मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही एआयएसएफतर्फे देण्यात आला आहे. यावेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष विराज देवांग यांच्यासह अविनाश दोंदे, तल्हा शेख, अक्षय दोंदे, गायत्री मोगल, जयंत विजयपुष्प, प्रज्वल खैरनार, प्राजक्ता कापडने, प्रणाली मगर, शरद खाडे आदींनी आंदोलनात सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या.एआयएसएफच्या मागण्या- राज्यातील शाळा, व्यावसायिक तसेच गैर व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची ७० टक्के फी माफ करण्याचे आदेश राज्य सरकारने काढावेत, उर्वरित ३० टक्के फी ही शासनाने महाविद्यालयांना ग्रांट म्हणून द्यावी.- ऑनलाईन शिक्षण सुविधेच्या अभावापोटी विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट तसेच दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप उपलब्ध करून द्यावेत.- महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश व शुल्क यांचे नियमन कायदा २०१५ तील विद्यार्थी विरोधी तरतुदी दुरुस्त करावी,- सामाजिक न्याय विभागातर्फे कार्यरत सर्व शिष्यवृत्ती योजनांची मदत विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करा.- रद्द केलेली ओबीसी, एससी, व एसटी प्रवर्गासाठीची फ्रीशिप योजना शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी लागू करावी.- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज सरसकट माफ करावे आणि कोविड पार्श्वभूमीवर शैक्षणिक कर्ज वाटपात २५ टक्के वाढ देण्याचे आदेश बँकांना द्यावेत.

टॅग्स :Nashikनाशिकcollectorजिल्हाधिकारी