शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
4
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
5
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७,७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
7
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
8
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
9
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
10
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
11
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
12
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
13
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
14
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
15
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
16
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
17
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
18
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
19
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
20
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण

नाशिककर, आता तरी बस्स कर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 22:36 IST

नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. मालेगावसारखा भाग ग्रामीणबरोबरच शहरातील आरोग्य सजग- सुशिक्षित भागातदेखील तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात कोण आहेत, ते तपासून त्यांच्या जीव वाचविण्यासाठी तीन तीन किलोमीटर परीसर आरोग्य यंत्रणांना सील करावा लागत असेल तर बाहेरून कोणी येऊ नये यासाठी गावबंदी करणारे ग्रामस्थ परवडले!

ठळक मुद्देतीन कोरोना बाधित सापडलेसंचारबंदीची ऐशी-तैशीशिथिल नियमांचा दुरुपयोग

संजय पाठक, नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. मालेगावसारखा भाग ग्रामीणबरोबरच शहरातील आरोग्य सजग- सुशिक्षित भागातदेखील तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात कोण आहेत, ते तपासून त्यांच्या जीव वाचविण्यासाठी तीन तीन किलोमीटर परीसर आरोग्य यंत्रणांना सील करावा लागत असेल तर बाहेरून कोणी येऊ नये यासाठी गावबंदी करणारे ग्रामस्थ परवडले! आताही कोरोनाबाबत स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर आता ‘नाशिककर बस कर, संचारबंदीचे पालन कर’ म्हणण्याची वेळ आली आहे.

जगावर आलेले संकट बघता कोरोेनाची महामारी आपल्याकडे फिरकू नये यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परंतु त्याचे गांभीर्य आपल्याकडे आहे की नाही, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती सध्या दिसते आहे. कोरोना टाळण्यासाठी संचारबंदी लागू झाली. म्हणजेच कोणीही रस्त्यावर फिरायचे नाही हा कायदा!

खरे तर दंगलीतील संचारबंदी आणि आरोग्यावरील आपत्तीमुळे आलेली संचारबंदी पूर्णत: वेगळी. त्यामुळे यंत्रणांची भूमिका बदलली. कायद्याचा धाक दाखविणे आणि दंडुक्याचा वापर करण्यापेक्षाही सामंजस्याने घेतलेले बरे, यामुळे संचारबंदीतही नित्याचे दैनंदिन जगणे सुखकर व्हावे यासाठी यंत्रणांनी खूप सुविधा दिल्या. किराणा आणि औषधांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. भाजीबाजाराची व्यवस्था निश्चित केल्या. घरपोच भाजीपाला देण्यासाठीही व्यवस्था केली. कोणाला भोजनाची भ्रांती पडली तरी खाद्य सेवा पुरवणाऱ्या काही कंपन्यांना सवलती दिल्या. त्यासाठी पार्सल सेवा सुरू ठेवली. औषधेदेखील घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. बॅँकेत कोणीही जाऊ शकेल, असे सारे काही अत्यावश्यक म्हणून करता येईल त्याची सोय महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केली. परंतु त्याचे तात्पर्य काय? अशा कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा दुसरे निमित्त करून शहरात भटकंती करण्याचे मात्र थांबत नाही.

अत्यावश्यक कामासाठी कोणी जात असेल तर त्यालाही अटकाव नाही. परंतु ही सारी सोय म्हणजे जणू शहरात संचारबंदीच नाही असे समजून हुंदडणाऱ्यांना काय म्हणणार? शहरात गर्दी वाढू लागली. कारण नसताना हिंडणारे, बंद शहराचे व्हिडीओ काढणारे, बंदीमुळे घरात बसून कंटाळलो म्हणून पाय मोकळे करण्यासाठी बाहेर येणारे सर्वच रस्त्यावर येऊ लागले. जॉगिंगसाठी बाहेर येणारे आरोग्य संवर्धनासाठी शहरात येतात की जीव धोक्यात घालण्यासाठी एवढी साधी जाणीवही त्यांना नाही. काही महाभाग तर कुत्र्यांना फिरवण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात. या सर्वांना पायबंद घालायचा पण कोणी? पोलिसांनी एक लाठी मारली की, त्यांच्या नावाने शिवीगाळ करणारे, प्रसंगी त्यांच्यावर धावून जाणारे आपण असे स्वैराचार का करतोय याचे साधे आत्मपरीक्षणदेखील करीत नाही.

कायद्याला आणि नियमांना आव्हान देण्याची एक प्रवृत्ती वाढत आहे. वाहतूक नियमांचे किंवा संचारबंदीचे अशा प्रकारच्या नियमांचे भंग केल्यास थ्रील अनुभवणारी मंडळी आहे. यंत्रणांना चकवून आपण कसे इप्सित साध्य केले हे अभिमानाने सांगणारी मंडळी आहेत. नियमांची चौकट मोडण्याचा वृथा अभिमान नष्ट होत नसेल तर शासकीय यंत्रणांनी इतकी शिथिलता द्यावी काय? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तथापि, यंत्रणांना अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर केवळ सोशल मीडियावर स्टे होमचे स्टेट््स टाकून बाहेर फिरण्याची हौस टाळणेच आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर, विकासयुक्त नाशिकबरोबर आज निरोगी नाशिक, कोरोनामुक्त नाशिक अशी घोषणा देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयPoliceपोलिस