शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

नाशिककर, आता तरी बस्स कर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 22:36 IST

नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. मालेगावसारखा भाग ग्रामीणबरोबरच शहरातील आरोग्य सजग- सुशिक्षित भागातदेखील तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात कोण आहेत, ते तपासून त्यांच्या जीव वाचविण्यासाठी तीन तीन किलोमीटर परीसर आरोग्य यंत्रणांना सील करावा लागत असेल तर बाहेरून कोणी येऊ नये यासाठी गावबंदी करणारे ग्रामस्थ परवडले!

ठळक मुद्देतीन कोरोना बाधित सापडलेसंचारबंदीची ऐशी-तैशीशिथिल नियमांचा दुरुपयोग

संजय पाठक, नाशिक : गेल्या महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोना संसर्गाबाबत नाशिक सुरक्षित वाटत होते आणि अचानक दुर्दैव सुरू झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातच नव्हे तर शहरातही बाधित रुग्ण आढळले आहेत. बघता बघता जिल्ह्यात ही संख्या पंधरावर पोहोचली आणि दोन जणांचे बळी गेले. मालेगावसारखा भाग ग्रामीणबरोबरच शहरातील आरोग्य सजग- सुशिक्षित भागातदेखील तीन रुग्ण आढळले आहेत. त्यांच्या संपर्कात कोण आहेत, ते तपासून त्यांच्या जीव वाचविण्यासाठी तीन तीन किलोमीटर परीसर आरोग्य यंत्रणांना सील करावा लागत असेल तर बाहेरून कोणी येऊ नये यासाठी गावबंदी करणारे ग्रामस्थ परवडले! आताही कोरोनाबाबत स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर आता ‘नाशिककर बस कर, संचारबंदीचे पालन कर’ म्हणण्याची वेळ आली आहे.

जगावर आलेले संकट बघता कोरोेनाची महामारी आपल्याकडे फिरकू नये यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परंतु त्याचे गांभीर्य आपल्याकडे आहे की नाही, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी स्थिती सध्या दिसते आहे. कोरोना टाळण्यासाठी संचारबंदी लागू झाली. म्हणजेच कोणीही रस्त्यावर फिरायचे नाही हा कायदा!

खरे तर दंगलीतील संचारबंदी आणि आरोग्यावरील आपत्तीमुळे आलेली संचारबंदी पूर्णत: वेगळी. त्यामुळे यंत्रणांची भूमिका बदलली. कायद्याचा धाक दाखविणे आणि दंडुक्याचा वापर करण्यापेक्षाही सामंजस्याने घेतलेले बरे, यामुळे संचारबंदीतही नित्याचे दैनंदिन जगणे सुखकर व्हावे यासाठी यंत्रणांनी खूप सुविधा दिल्या. किराणा आणि औषधांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली. भाजीबाजाराची व्यवस्था निश्चित केल्या. घरपोच भाजीपाला देण्यासाठीही व्यवस्था केली. कोणाला भोजनाची भ्रांती पडली तरी खाद्य सेवा पुरवणाऱ्या काही कंपन्यांना सवलती दिल्या. त्यासाठी पार्सल सेवा सुरू ठेवली. औषधेदेखील घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली. बॅँकेत कोणीही जाऊ शकेल, असे सारे काही अत्यावश्यक म्हणून करता येईल त्याची सोय महापालिका, पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने केली. परंतु त्याचे तात्पर्य काय? अशा कामाच्या निमित्ताने म्हणा किंवा दुसरे निमित्त करून शहरात भटकंती करण्याचे मात्र थांबत नाही.

अत्यावश्यक कामासाठी कोणी जात असेल तर त्यालाही अटकाव नाही. परंतु ही सारी सोय म्हणजे जणू शहरात संचारबंदीच नाही असे समजून हुंदडणाऱ्यांना काय म्हणणार? शहरात गर्दी वाढू लागली. कारण नसताना हिंडणारे, बंद शहराचे व्हिडीओ काढणारे, बंदीमुळे घरात बसून कंटाळलो म्हणून पाय मोकळे करण्यासाठी बाहेर येणारे सर्वच रस्त्यावर येऊ लागले. जॉगिंगसाठी बाहेर येणारे आरोग्य संवर्धनासाठी शहरात येतात की जीव धोक्यात घालण्यासाठी एवढी साधी जाणीवही त्यांना नाही. काही महाभाग तर कुत्र्यांना फिरवण्याच्या निमित्ताने बाहेर पडतात. या सर्वांना पायबंद घालायचा पण कोणी? पोलिसांनी एक लाठी मारली की, त्यांच्या नावाने शिवीगाळ करणारे, प्रसंगी त्यांच्यावर धावून जाणारे आपण असे स्वैराचार का करतोय याचे साधे आत्मपरीक्षणदेखील करीत नाही.

कायद्याला आणि नियमांना आव्हान देण्याची एक प्रवृत्ती वाढत आहे. वाहतूक नियमांचे किंवा संचारबंदीचे अशा प्रकारच्या नियमांचे भंग केल्यास थ्रील अनुभवणारी मंडळी आहे. यंत्रणांना चकवून आपण कसे इप्सित साध्य केले हे अभिमानाने सांगणारी मंडळी आहेत. नियमांची चौकट मोडण्याचा वृथा अभिमान नष्ट होत नसेल तर शासकीय यंत्रणांनी इतकी शिथिलता द्यावी काय? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. तथापि, यंत्रणांना अशी वेळ येऊ द्यायची नसेल तर केवळ सोशल मीडियावर स्टे होमचे स्टेट््स टाकून बाहेर फिरण्याची हौस टाळणेच आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर, विकासयुक्त नाशिकबरोबर आज निरोगी नाशिक, कोरोनामुक्त नाशिक अशी घोषणा देण्याची वेळ आली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयPoliceपोलिस