शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

नाशिककरांना उन्हाचा चटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 01:25 IST

शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. 

ठळक मुद्देझळा तीव्र : पारा थेट ३९.१ अंशावर

नाशिक : शहर व परिसरात मागील वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८) तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशापर्यंत पोहोचल्याची नोंद हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली. रविवारी दिवसभर प्रचंड कडक ऊन पडल्याने नाशिककर घामाघुम झाले होते. शहरासह उपनगरांमधील रस्तेही ओस पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. मागील आठवड्यात शहराचे कमाल तापमान पस्तिशीच्या जवळपास तर किमान तापमान १७ ते १९ अंशापर्यंत स्थिरावत होते. मागील दोन दिवसांपासून अचानक उन्हाची तीव्रता वाढली आहे. यामुळे नाशिककरांना उन्हाचा जोरदार चटका सहन करावा लागत आहे. तत्पूर्वी शहरात अवकाळी पावसाचे ढग दाटून येत होते तसेच हलक्या सरीही पहाटे व संध्याकाळी कोसळत होत्या. शनिवारी शहरात ३८.२ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले होते. त्यानंतर रविवारी यामध्ये पुन्हा वाढ  होऊन पारा ३९.१ अंशापर्यंत वर सरकला. दिवसभर प्रखर ऊन पडल्यामुळे नागिरकांना झळा असह्य झाल्या होत्या. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहरांमधील रस्ते सामसुम दिसून आले. यामुळे रविवारी कोरोना निर्बंधांचे पालन अधिकाधिक काटेकोरपणे होताना दिसून आले. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, आईस्क्रीम पार्लरमध्येही दिवसभर फारशी वर्दळ पाहावयास मिळाली नाही. कडक उन्हामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने कोरोनाच्या निर्बंधांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी झाली.यंदा कडक उन्हाळामागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उन्हाच्या झळा अधिकाधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत निसर्गाने दिले आहे. मार्च महिन्याचे अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले असून बुधवारपर्यंत (दि. ३१) कमाल तापमानाचा पारा चाळिशीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता हवामान केंद्राकडून वर्तविली जात आहे. यापूर्वी २००४ साली १९ मार्च रोजी तसेच २०१९ साली २९ मार्च रोजी शहरात उच्चांकी ४०.४ अंश इतके कमाल तापमान नोंदविले गेले आहे.आरोग्याबाबत राहावे लागणार सतर्क उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याने नाशिककरांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. एकीकडे बदलते ऋतुमान अन् हवामानामुळे आरोग्यावर होणारा परिणाम तर दुसरीकडे पुन्हा मागील वर्षाप्रमाणेच गडद झालेले कोरोनाचे संकट अशा दुहेरी धोक्याचा सामना नाशिककरांना करावा लागणार आहे. शरीरातील पाण्याची मात्रा टिकून ठेवण्यावर नागरिकांनी भर देणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान