शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

नाशिक विभागात १५० टक्के विक्रमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 22:13 IST

नाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.

ठळक मुद्देदुप्पट नोंद : तीस वर्षांतील सर्वाधिक; जिल्ह्यातील सर्वच धरणे फुल्ल; टंचाईचा प्रश्न मिटला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिक विभागामध्ये यंदा जवळपास १५० टक्के पाऊस झाला असून, गेल्या ३० वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद शासन दरबारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट पाऊस यंदा झाला आहे.विभागामध्ये दि. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १०१३.४ मिमी, धुळे- ५३०.५, नंदुरबार - ८३५.८, जळगाव- ६६३.३, अहमदनगर जिल्ह्यात- ४३६.४ मिमी असा एकूण ६५९.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. मात्र यंदा पावसाने कहरच केल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे परतीच्या पावसानेदेखील चांगलाच जोर लावला आहे. दि. १ जून ते ३० सप्टेंबर पावसाळा ऋतूच्या चार महिन्यांच्या कालावधीत नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के), धुळे - ९५९ मिमी (१८०.८ टक्के), नंदुरबार- १३३६.८ मिमी. (१५९.९ टक्के), जळगाव- ७९५.७ मिमी (१२० टक्के), अहमदनगर- ५२९.५ मिमी (१२१.३ टक्के) पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.विभागातील पाचही जिल्ह्यांत १२५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. गेल्यावर्षी नाशिक विभागात ७५.७ टक्के पाऊस झाला होता. तालुकानिहाय पडलेला पाऊस नाशिक १२३२ मिमी (२०० टक्के), इगतपुरी- ५३०.४ मिमी (१५९ टक्के), दिंडोरी- १२१४ मिमी (१७४ टक्के), पेठ-३३४६ मिमी (१५२ टक्के), मालेगाव-६३५ मिमी (१४४ टक्के), नांदगाव-५३६ मिमी (११५ टक्के), चांदवड-६९२ मिमी (१३३ टक्के), कळवण-६८२ मिमी (१०३ टक्के), बागलाण-६६९ मिमी (१५९ टक्के), निफाड-५४१ मिमी (१२७ टक्के), सुरगाणा-२८४० मिमी (१६३ टक्के), सिन्नर-७५६ मिमी (१५४ टक्के), येवला- ७०९ मिमी (१६४ टक्के), त्र्यंबकेश्वर-३८६२ मिमी (१७६ टक्के), देवळा- ४९८ मिमी (८७ टक्के) असा एकूण नाशिक जिल्ह्यात १५६७.८ मिमी (१५४.७ टक्के) पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.यंदा दुप्पट पाऊस झाल्याने पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट दूर झाले आहे. तर जमिनीत-देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास चांगलीच मदत झाली आहे.

टॅग्स :WaterपाणीRainपाऊस