शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 01:35 IST

नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने ...

ठळक मुद्देआयुक्त कैलास जाधव : येत्या पाच वर्षात नाशकात लाकडांविना होणार अंत्यसंस्कार

नाशिक : पर्यावरण संवर्धन करून प्रदूषण म्हणजेच विशेषत: कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी युनोने आखलेल्या झिरो कार्बन मिशनमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे. २०५० पर्यंत कार्बनमुक्त शहर करण्यासाठी आयुक्त कैलास जाधव यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे आता महापालिका त्या दृष्टीने काम करणार असून, येत्या काही वर्षात अंत्यसंस्कारासाठी होत असलेला लाकडांचा वापर पूर्णत: थांबविण्यात येणार आहे. नाशिक महापालिकेने टप्प्याटप्प्याने राबविण्यासाठी काही उद्दिष्ट निश्चित केली असून, त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’शी बोलताना दिली.पर्यावरणीय दृष्टिकोनातून नाशिक हे अत्यंत उत्तम शहर आहे. त्याची हीच ओळख राहावी यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी या उपक्रमाचे उद्दिष्टदेखील पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता शाश्वत विकास असाच आहे. त्यात आता नाशिक महापालिकेने युनोच्या झिरो कार्बन मिशनमध्ये सहभाग घेतल्याची माहिती आयुक्तांनी दिली. कोरोनाचे महासंकट असतानाच यासंदर्भातील प्रस्ताव आल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दहा ते पन्नास लाख लोकसंख्येच्या दुसऱ्या स्तरातील शहरांमध्ये नाशिक महापालिकेने सहभाग घेतला आहे.या मोहिमेंतर्गत २०५० पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्बन उत्सर्जन संपुष्टात आणण्याचे उद्दिष्ट आहे. काही उद्दिष्टे महापालिकेने ठरवायची असून, काही युनोच्या माध्यमातून दिली जाणार आहेत.महापालिकेने येत्या तीन ते पाच वर्षांची काही उद्दिष्ट ठरवली आहेत. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी लाकडांचा वापर पूर्णत: थांबवून त्याऐवजी विद्युत तसेच गॅसदाहिनीचा वापर शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरात झाडे लावून ऑक्सिजन हब तयार करणे असे विविध उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार आहे. युनोच्या माध्यमातून झिरो कार्बन करण्यासाठी काय करता येईल याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. ‘माझी वसुंधरा’मध्ये नाशिक सर्वोत्तमशासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नाशिक महापालिकेने भरीव कामगिरी केली असून, त्यामुळे शनिवारी (दि. ५) राज्य शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन सोहळ्यात आयुक्त कैलास जाधव यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कोरोनाकाळातदेखील महापालिकेने पर्यावरणविषयक कामे सुरूच ठेवली. धुलिकरण रोखण्यासाठी खडीच्या रस्त्यावर पाण्याचा वापर, नदीचे संवर्धन, नदीपात्रातील गाळ काढणे, उद्यानातील वृक्ष संवर्धन अशा विविध कारणांमुळे महापालिकेला हा बहुमान मिळाला आहे.  

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाenvironmentपर्यावरण