शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

कालीदास कलामंदिराच्या नियमावलीवर नाशिक महापालिकेचे माघारी नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:39 IST

नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशाळा इतकीच नाट्यगृहे देखील महत्वाची असतात हे बहुधा महापालिकेला मान्य नसावे, त्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने द्यावे आणि त्यासाठी जी नियमावली लावावी तीच नियमावली लावण्यामुळेच बहुधा कलावंतासारख्या अभिजनातून नाराजीचा सूर उमटला आणि गेल्यावषी पर्यंत नियमावलीचे समर्थन करणाºया नाशिक महापालिकेला माघार नाट्य करावे लागले.

ठळक मुद्देमहापालिका प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे सांस्कृतिक भूख ही अन्य गरजांइतकीच महत्वाची

संजय पाठक, नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशाळा इतकीच नाट्यगृहे देखील महत्वाची असतात हे बहुधा महापालिकेला मान्य नसावे, त्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने द्यावे आणि त्यासाठी जी नियमावली लावावी तीच नियमावली लावण्यामुळेच बहुधा कलावंतासारख्या अभिजनातून नाराजीचा सूर उमटला आणि गेल्यावषी पर्यंत नियमावलीचे समर्थन करणा-या नाशिक महापालिकेला माघार नाट्य करावे लागले.कालिदास कलामंदिर हे महापालिकेचे नाट्यगृह तसे जूने. नाशिकच्या अनेक कलावतांनी कालिदास नाट्यगृहापासूनच प्रायोगिक नाटके करून व्यावसायिक नाटके, दुरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटापर्यंत मजल मारली आहे. सांस्कृतिक भूख ही देखील अन्य गरजांइतकीच महत्वाची आहे. परंतु महापालिकेला यात व्यवसाय दिसू लागल्याने महापालिकेत संवेदनशीलता किंवा वैचारीकतेचा भाग आहे किंवा नाही असा प्रश्न पडला. मुळात नाट्यमंदिराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली आणि नाशिकमधीलच नव्हे प्रशांत दामले, भरत जाधव यांच्या सारख्या नाट्य अभिनेत्यांनी महापालिकेची इभ्रतच चव्हाट्यावर मांडली तेव्हा कुठे सुधारणा करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर कुठे तरी स्मार्ट सिटी अंतर्गत कलामंदिरचे काम पुढे गेले तेही कलावंताना विश्वासात न घेता!आता कालीदास कला मंदिराचे नुतनीकरण तब्बल ९ कोटी रूपये खर्च करून पुर्ण झाल्यानंतर आता नुतनीकरणाचे निमित्त करूनच हीच भाडेवाढीची संधी आहे. असे समजून अवास्तव वाढ करण्यात आली. तीचे कवित्व संपत नाही तोच नियमावलीचा जाच पुढे आला. एखादे नाटक रद्द झाले तर भाडे आणि अनामत जप्त हे गेल्या वर्षभरापासून सारे नाट्य व्यवसायिक सहन करत आहेत. मुळात भाडे वेगळे आणि अनामत रक्कम वेगळी. साहित्याचा वापर करताना कोणतीही तुटफूट झालीच तर त्याची वसुली करता यावी यासाठी अनामत रक्कम आकारली जाते. परंतु नाट्य प्रयोग रद्द केला तर भाडे आणि अनामत जप्त असा तुघलगी प्रकार होता. गंमतीचा भाग म्हणजे नियमावलती एका ठिकाणी महापालिकेने पंधरा दिवस नाटक रद्द केले तर किती भाडे घेतले जाईल वगैरे कोष्टक दिले असून दुसरीकडे एका कलमात भाडे आणि अनामत रक्कम जप्त करण्यात येईल असे नमुद केले आहे. बरे तर नाटक महापालिकेच्या कामामुळे किंवा अन्य व्हीआयपीच्या कार्यक्रमामुळे प्रशासन रद्द करू शकते, मग त्याच्या भरपाईचे काय याचा कोठेही उल्लेख नाही. अशा अनेक विसंगती असतानाही त्याबाबत मात्र कोणाचे ऐकून न घेता हीच नियमावली वर्षभरापासून पुढे रेटली जात आहे. लोकमतने याबाबत आवाज उठवलाच परंतु अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आपल्या स्वानुभवारून देखील महापालिकेची लक्तरे राज्यभरात वेशीवर टांगली मग कुठे प्रशासनाला जाग आली आणि काही तरी बदल करण्याची तयारी चालवली आहे.कालिदास कलामंदिर काय किंवा समाज मंदिरे आणि व्यायामशाळा काय, महापालिका सर्वच ठिकाणी उत्पन्नाचे साधन शोधत आहे. महापालिका ही पालक संस्था आहे. प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे , हे कारभाऱ्यांना कधी कळणार की प्रत्येकवेळी कोणाला तरी कान टोचावे लागणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPrashant Damleप्रशांत दामले