शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

कालीदास कलामंदिराच्या नियमावलीवर नाशिक महापालिकेचे माघारी नाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:39 IST

नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशाळा इतकीच नाट्यगृहे देखील महत्वाची असतात हे बहुधा महापालिकेला मान्य नसावे, त्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने द्यावे आणि त्यासाठी जी नियमावली लावावी तीच नियमावली लावण्यामुळेच बहुधा कलावंतासारख्या अभिजनातून नाराजीचा सूर उमटला आणि गेल्यावषी पर्यंत नियमावलीचे समर्थन करणाºया नाशिक महापालिकेला माघार नाट्य करावे लागले.

ठळक मुद्देमहापालिका प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे सांस्कृतिक भूख ही अन्य गरजांइतकीच महत्वाची

संजय पाठक, नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशाळा इतकीच नाट्यगृहे देखील महत्वाची असतात हे बहुधा महापालिकेला मान्य नसावे, त्यामुळे व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने द्यावे आणि त्यासाठी जी नियमावली लावावी तीच नियमावली लावण्यामुळेच बहुधा कलावंतासारख्या अभिजनातून नाराजीचा सूर उमटला आणि गेल्यावषी पर्यंत नियमावलीचे समर्थन करणा-या नाशिक महापालिकेला माघार नाट्य करावे लागले.कालिदास कलामंदिर हे महापालिकेचे नाट्यगृह तसे जूने. नाशिकच्या अनेक कलावतांनी कालिदास नाट्यगृहापासूनच प्रायोगिक नाटके करून व्यावसायिक नाटके, दुरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटापर्यंत मजल मारली आहे. सांस्कृतिक भूख ही देखील अन्य गरजांइतकीच महत्वाची आहे. परंतु महापालिकेला यात व्यवसाय दिसू लागल्याने महापालिकेत संवेदनशीलता किंवा वैचारीकतेचा भाग आहे किंवा नाही असा प्रश्न पडला. मुळात नाट्यमंदिराची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत गेली आणि नाशिकमधीलच नव्हे प्रशांत दामले, भरत जाधव यांच्या सारख्या नाट्य अभिनेत्यांनी महापालिकेची इभ्रतच चव्हाट्यावर मांडली तेव्हा कुठे सुधारणा करण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर कुठे तरी स्मार्ट सिटी अंतर्गत कलामंदिरचे काम पुढे गेले तेही कलावंताना विश्वासात न घेता!आता कालीदास कला मंदिराचे नुतनीकरण तब्बल ९ कोटी रूपये खर्च करून पुर्ण झाल्यानंतर आता नुतनीकरणाचे निमित्त करूनच हीच भाडेवाढीची संधी आहे. असे समजून अवास्तव वाढ करण्यात आली. तीचे कवित्व संपत नाही तोच नियमावलीचा जाच पुढे आला. एखादे नाटक रद्द झाले तर भाडे आणि अनामत जप्त हे गेल्या वर्षभरापासून सारे नाट्य व्यवसायिक सहन करत आहेत. मुळात भाडे वेगळे आणि अनामत रक्कम वेगळी. साहित्याचा वापर करताना कोणतीही तुटफूट झालीच तर त्याची वसुली करता यावी यासाठी अनामत रक्कम आकारली जाते. परंतु नाट्य प्रयोग रद्द केला तर भाडे आणि अनामत जप्त असा तुघलगी प्रकार होता. गंमतीचा भाग म्हणजे नियमावलती एका ठिकाणी महापालिकेने पंधरा दिवस नाटक रद्द केले तर किती भाडे घेतले जाईल वगैरे कोष्टक दिले असून दुसरीकडे एका कलमात भाडे आणि अनामत रक्कम जप्त करण्यात येईल असे नमुद केले आहे. बरे तर नाटक महापालिकेच्या कामामुळे किंवा अन्य व्हीआयपीच्या कार्यक्रमामुळे प्रशासन रद्द करू शकते, मग त्याच्या भरपाईचे काय याचा कोठेही उल्लेख नाही. अशा अनेक विसंगती असतानाही त्याबाबत मात्र कोणाचे ऐकून न घेता हीच नियमावली वर्षभरापासून पुढे रेटली जात आहे. लोकमतने याबाबत आवाज उठवलाच परंतु अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आपल्या स्वानुभवारून देखील महापालिकेची लक्तरे राज्यभरात वेशीवर टांगली मग कुठे प्रशासनाला जाग आली आणि काही तरी बदल करण्याची तयारी चालवली आहे.कालिदास कलामंदिर काय किंवा समाज मंदिरे आणि व्यायामशाळा काय, महापालिका सर्वच ठिकाणी उत्पन्नाचे साधन शोधत आहे. महापालिका ही पालक संस्था आहे. प्रायव्हेट लिमीटेड कंपनी नव्हे , हे कारभाऱ्यांना कधी कळणार की प्रत्येकवेळी कोणाला तरी कान टोचावे लागणार हा खरा प्रश्न आहे.

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPrashant Damleप्रशांत दामले