शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाशिक मनसेत नाराजीनामा नाट्य! अनेक पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत

By संजय पाठक | Updated: February 27, 2024 17:39 IST

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते.

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यंदा लाेकसभा निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी सुरू असताना नाशिकच्या बालेकिल्ल्याला अंतर्गत हादरे बसू लागले आहेत. नाशिक लोकसभा संघटक किशोर शिंदे यांनीच गटबाजीकरून आपल्या जनसेवा कक्षातील पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारिणीत घेण्याची तयारी केल्याने काही पदाधिकाऱ्यांनी नाराजीनामा अस्त्र उगारले. त्यांची समजूत काढून पदाधिकारी नियुक्तीचा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला.त्यामुळे तूर्तास वाद शमला आहे.

नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असून, पक्षाच्या स्थापनेनंतर शहरातून तीन आमदार निवडून आले होते. त्यानंतर महापालिकेत ४० नगरसेवक देखील निवडूनआल्याने राज्यातील पहिली महापालिका काबीज करण्याची संधी मनसेला मिळाली होती; मात्र त्यानंतर पक्षात गटबाजी सुरू झाली आणि पक्षाची वाताहत झाली. पक्षाला नियंत्रित करणारे मुंबईतील पदाधिकारी स्थानिक गटबाजीत सहभागी हाेत असल्याने सामान्य कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. सध्या पक्षाने लोकसभासंघटक म्हणून किशोर शिंदे यांची नियुक्ती केली आहे. येत्या ९ मार्च रोजी पक्षाचा वर्धापनदिन नाशिकमध्ये साजरा हेात असून राज ठाकरे स्वत: पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत. त्याच्या तयारीसाठी किशोर शिंदे यांना नाशिकला पाठविण्यात आले हेाते. त्यावेळी हा वाद उफाळून आला.

टॅग्स :MNSमनसेNashikनाशिक