शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Nashik: लासलगाव बाजार समिती व्यापाऱ्यांवर करणार कारवाई, कांदा लिलाव दुसऱ्या दिवशीही बंद

By धनंजय वाखारे | Updated: September 21, 2023 14:49 IST

Nashik:  कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार पासून लिलाव बंद केले आहेत. परंतु  मार्केट सुरू राहावे अशी शेतकरी यांची मागणी आहे तर व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंद वर ते ठाम आहेत.

- शेखर देसाईनाशिक-  व्यापारी वर्गाने लिलावात सहभाग न घेतल्यास जिल्हा उपनिबंधक यांच्या निर्देशानुसार व्यापाऱ्यांना नोटीसा देऊन आणि  अनुज्ञप्ती निलंबित करण्याची तसेच व्यापारी वर्गांना बाजार समितीने दिलेल्या प्लॉट्सह  विविध सुविधा परत घेण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय आज   लासलगाव बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत  घेण्यात आला .

 कांदा व्यापाऱ्यांनी बुधवार पासून लिलाव बंद केले आहेत. परंतु  मार्केट सुरू राहावे अशी शेतकरी यांची मागणी आहे तर व्यापारी वर्गाची भूमिका बघता ते बंद वर ते ठाम आहेत. जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार आता व्यापाऱ्यांवर कारवाई होणार  असून परवाने निलंबित करणे तसेच त्यांना दिलेले भूखंड जमा करण्याची कारवाई केली जाणार आहे. बाजार समितीत १३१ व्यापारी आहेत. या सर्वांवर जिल्हा उप निबंधक यांचे सूचनेनुसार कारवाई होणार असून २५ ते २७ व्यापारी यांनी परवाने बाजार समितीत सादर केले आहेत.  तसेच बाजार समितीने ३६ व्यापाऱ्यांना भूखंड दिले आहेत,  ते परत घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बाजार समिती सभापती बाळासाहेब  क्षीरसागर यांनी सांगितले की, नोटिसा तयार आहेत. त्या दिल्या जाणार असून काही व्यापाऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नवीन परवाने मागितले तर ते लगेच देऊ असे सांगून क्षीरसागर यांनी सणासुदीच्या काळात लिलाव सुरू राहिले पाहिजे, शेतकरी प्रतिनिधी म्हणून ही आमची  संचालक मंडळाची भूमिका  आहे असे स्पष्ट केले.

दरम्यान, आज  सलग दुसऱ्या दिवशीही व्यापारी वर्गांचा बंद सुरूच आहे.  कांदा लिलाव बंद पडल्याने नाशिक जिल्ह्याचे नगदी पीक असलेल्या कांदा व्यवहाराचे खरेदी विक्री व्यवहार ठप्प झाले असून कांदा उत्पादकांचे दररोज किमान 30 ते 40 कोटी रुपयांची नाशिक जिल्ह्यात नुकसान होत आहे.

टॅग्स :onionकांदाNashikनाशिक