शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नाशिक कृउबाचा ‘ई-नाम’ योजनेत समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:15 IST

केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

पंचवटी : केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.  शेतक-यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नसून विक्री केलेल्या मालाचे त्वरित पेमेंटही मिळत नसल्याची अनेक वर्षांपासून शेतकºयांची तक्रार असल्याने शासनाने इलेक्ट्रॉनिक बाजार तयार करून इंटरनेटद्वारे शेतकºयांसाठी बाजारपेठ निर्माण करून दिली आहे. यामध्ये शेतकरी व व्यापाºयांचे आधारकार्ड, बँक खाते, मोबाइल रजिस्टर करून बाजार समितीत आलेल्या मालाची गेट इंट्री करून मालाची गुणवत्ता तपासणी व लॉट क्रिएशन करून मालाची विक्री ई ओकशनद्वारे करत रिपोर्ट जनरेट केले जातात. खरेदीदार व्यापारी पोर्टलद्वारे बिल देत असल्याने पूर्णपणे गोपनीयता असल्याने स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण होत असल्याने मालाला चांगला बाजारभाव मिळून शेतकºयांच्या खात्यावर त्वरित पेमेंट जमा होते. ई-नाम योजनेद्वारे शेतकºयांच्या मालाची विक्री करण्यासाठी कायदा पास केला आहे.शेतकºयांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या पर्यांयापैकी केंद्र शासनाने विकसित केलेले ई-नाम पोर्टलद्वारे विक्री केल्यास शेतकºयांची फसवणूक न होता शेतमालाचे योग्य वजन व चांगला बाजारभाव मिळून त्वरित पेमेंट मिळण्याची खात्री असल्याने शेतकºयांनी मालाची विक्री ई-नामद्वारे करावी, असे आवाहन बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, उपसभापती युवराज कोठुळे यांनी केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonlineऑनलाइन