नाशिक विभागाचा निकाल ९२ टक्के विक्रमी निकाल :
By Admin | Updated: June 9, 2015 01:41 IST2015-06-09T01:38:54+5:302015-06-09T01:41:32+5:30
विभागामध्ये नाशिक जिल्हा अव्वलस्थानी

नाशिक विभागाचा निकाल ९२ टक्के विक्रमी निकाल :
नाशिक : मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या शालांत परीक्षेचा नाशिक विभागाचा एकूण निकाल ९२.१६ टक्के लागला असून, राज्यात नाशिक पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत नाशिकचा यंदाचा निकाल विक्रमी ठरला आहे. नाशिक- ९२.८३ टक्के, धुळे- ९१.३६, जळगाव- ९१.७६, तर नंदुरबारचा निकाल ९१.५३ टक्के इतका लागला आहे. विभागात नाशिक जिल्'ाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. दहावीच्या शालांत परीक्षेचा यंदाचा नाशिक विभागाचा निकाल विक्रमी लागला आहे. नवीन अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर प्रथमच विभागाच्या निकालाचा आलेख उंचावला आहे. दरवर्षी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक राहिले आहे. विभागात एक लाख सहा हजार ९५५ मुलांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी ९७ हजार २१ मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीमध्ये यंदा वाढ झाल्याचे दिसून आले असून, हे प्रमाण ९०.७० टक्के आहे. त्याचप्रमाणे मुलींनी यंदाही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे; मात्र मुले त्यांच्या टक्केवारीच्या अगदी जवळ पोहचले असून, दोघांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक दिसून आला नाही. विभागातून ८५ हजार ८८ मुलींनी दहावीची परीक्षा दिली व त्यापैकी ७९ हजार ९७७ मुली उत्तीर्ण झाल्या असून, ही टक्केवारी ९३.९९ इतकी आहे. एकूणच मुला-मुलींच्या निकालाच्या टक्केवारीत अवघ्या साडेतीन टक्क्यांचा फरक राहिला आहे. सर्व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणाऱ्या शालेय अभिलेखांचे वाटप सोमवार, दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येईल व त्याच दिवशी दुपारी तीन वाजता शाळांमार्फत विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. नाशिक विभागात एकूण ५४८ शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. इन्फो.... १५ जूनपासून गुणपडताळणी ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर दि. १५ ते दि. २५ जूनपर्यंत विहित नमुन्यात निश्चित शुल्कासह मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात शालांत परीक्षा द्यावयाची आहे, त्यांच्या तारखा स्वतंत्रपणे मंडळाकडून जाहीर करण्यात येणार आहेत. जोड आहे.......