शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नाशिक विभागाचा निकाल 9.84 टक्यांनी घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 14:49 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे.

ठळक मुद्देदहावीचा निकाल जाहीरनाशिक विभागाचा टक्का घसरलाविभागातील १७९ शाळांचा शंभर टक्के निकाल

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा अर्थात दहावीचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर झाला असून यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत दहावीच्या निकालात तब्बल ९.८४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी ८६.४२ टक्के असलेल्या विभागाचा निकाल यावर्षी ७७.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. शिक्षण मंडळाने प्रश्नपत्रिकांऐवजी कृतीपत्रीकांचा केलेला प्रयोग विद्यार्थ्यांच्या लक्ष न आल्याने निकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचा निरीक्षण शैक्षणिक क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नाशिकसह, धुळे, नंदुरबार जळगाल या चारही जिल्ह्यांत  ११ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत प्रात्यक्षिक  तर १ ते २२ मार्च या कालवधीत ४३३ परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली होती.  विभागात मराठी , हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, गुजराथी,कन्नड व तमीळ या आठ भाषांमध्ये घेण्यात आलेल्या पपरीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विभागातून परीक्षेला प्रविष्ठ एकूण १ लाख ९८ हजार ७५० विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४१ हजार १९३ म्हणजे ७७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  विभागातील तब्बल १७९ शाळाचा शंभर टक्के निकाल लागला आहे. तर ४४५ शालांचा निकाल ९० टक्क्यांहून अधिक लागला आहे. यात प्रामुख्याने इंग्रजी विषयात विभागातील विद्यार्थ्यांची हुश्शारी दिसून आली असून प्रथम भाषा इंग्रजी विषयाचे सर्वाधिक ९६.३३ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्या खोलोखाल विज्ञान ९४.४८ द्वीतीय व तृतीय भाषा मराठी ९३.६२, गणित ९२.५७,  सामाजिक शास्त्र ९२. १२, मराठी प्रथम भाषा ७९.२६ , प्रथम भाषा हिंदी ८४.१८, इंग्रजी द्वतीय वतृतीय भाषा ८३.११, प्रथम भाषा उर्दू ८०.३ टक्के  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दहावीच्या परीक्षा यावर्षी प्रथमच प्रश्नपत्रीकांऐवजी कृतीपत्रीकांच्या पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. त्यासाठी शिक्षकांचे विशेष प्रशिक्षणही घेण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून सरावासाठी कृतीपत्रीका सोडवूनही घेण्यात आल्या होत्या. परंतु हा प्रयोग विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे पचणी न पडल्याचे निकालाचा टक्का घसरल्याने दिसून येत आहे. 

यामुळे घसरला निकालाचा टक्का प्रश्नपत्रिके ऐवजी कृतीपत्रिकेची बदललेली परीक्षा आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने अभ्यासाचा सराव नसणे फिरत्या पथकांची परीक्षेवर करडी नजरबैठे पथकांनी पेपर पूर्ण होईपर्यंत परीक्षेवर नजर ठेवली 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSSC Resultदहावीचा निकालStudentविद्यार्थीSchoolशाळा