शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडीची झाली नोंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 01:01 IST

शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. 

ठळक मुद्देकिमान तापमानात घट : १० अंशांपर्यंत घसरला पारा; नाशिककरांना भरली हुडहुडी

नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. गुरुवारी (दि.४) तापमान ११.८ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमान ३१.३, तर किमान तापमान १३ अंशांपर्यंत वर सरकले; मात्र दोनच दिवसांत अचानक या दोन्ही तापमानात वेगाने घसरण झाली. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरले. ३१ अंशावरून थेट २८.३ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने नाशिककरांना रविवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. शनिवारी रात्री नऊ वाजेपासूनच थंड वारे वेगाने वाहू लागले हाेते. शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी ८.३० वाजता पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात १० अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वात नीचांकी तापमान नाशिकमध्ये थंडीचा कडाका जाणवला.जानेवारीअखेरपासून थंडीचा वाढला कडाका२५ जानेवारी रोजी शहरात १०.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या संपूर्ण आठवड्यात १२ अंशांच्यापुढे किमान तापमान न गेल्याने थंडीची तीव्रता नाशिककरांना चंगलीच अनुभवायला आली होती. जानेवारी महिना थंडीच्या कडाक्याचा म्हणून ओळखला जात असला तरी फेब्रुवारीत थंडी गायब होईल, असे वाटत असताना पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नाशिककरांना ऊबदार कपड्यांच्या वापरावर अधिकच भर द्यावा लागत आहे. या शहरांमध्ये थंडीची लाटनाशिकपाठोपाठ गोंदियामध्ये १०.२ तर जळगावात १०.४ आणि पुण्यात १०.८ अंश इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यात ही शहरे कमालीची गारठली आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा सर्वाधिक परिणाम या शहरांमधील वातावरणावर होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस नाशिमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान