शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

नाशिक दुर्घटनाः ड्रायव्हरचा लोभ 'त्या' १० जणांच्या जीवावर बेतला; बसच्या 'आतली माहिती' उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 12:39 IST

या घटनेसंदर्भात सविस्तर अहवाल पोलिसांनी तयार केला आहे.

संदीप झिरवाळपंचवटी : औरंगाबाद महामार्गावर पंधरवड्यापूर्वी भल्या पहाटे झालेल्या लक्झरी बस ट्रक दुर्घटनेत एकूण १३ प्रवासी मृत्युमुखी पडले. आगाऊ बुकिंग न करता यवतमाळ-नाशिक प्रवासादरम्यान बसमध्ये बसलेल्या दहा प्रवाशांचा मृतांमध्ये समावेश आहे. तसेच अपघातसमयी बसमध्ये चालकांसह साठ लोक होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल पोलिसांनी तयार केला आहे.

यवतमाळ येथून मुंबईला प्रवासी घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या स्लीप कोच लक्झरी बस (एमएच  २९ एडब्लू ३१००) आणि आयशर ट्रक (जीजे ०५ बीएक्स ०२२६) यामध्ये जोरदार धडक झाली होती. धडकेनंतर संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे १२ प्रवासी होरपळून जागेवर ठार झाले होते, तर एका प्रवाशाने दोन दिवसांपूर्वी प्राण सोडले. ही भीषण दुर्घटना तपोवनाजवळ कैलासनगर चौफुलीवर शनिवारी (दि. ८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. 

अवघ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या या अपघाताने ट्रॅव्हल्सकडून केल्या जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीसह रस्ता सुरक्षा व आपत्कालीन यंत्रणेची मदत अशा सर्वच बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. 

प्राणही गेले अन् साडेतीन लाखांची रोकडही जळाली> यवतमाळ येथून नाशिकला कार खरेदीसाठी येत असलेल्या एका प्रवाशाचा या दुर्घटनेत नाशिकमध्येच मृत्यू झाला.> कार खरेदीसाठी सोबत असलेल्या बॅगेत त्याने सुमारे साडेतीन लाख रुपये घेतलेले होते. या रोकडचीही राख झाल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे.> त्या प्रवाशाने नाशिकमध्ये राहणाऱ्या आपल्या भाच्याला प्रवासादरम्यान मी नाशिकला कार घेण्यासाठी येत असल्याचे फोनवरून कळविलेसुद्धा होते.

नाशिकचे दाम्पत्य बचावले> यवतमाळ येथून निघालेल्या या बसमध्ये नाशिकचे सेवानिवृत्त प्राध्यापक हे त्यांच्या पत्नीसह प्रवास करत होते. त्यांचे दैव बलवत्तर असल्यामुळे ते या भीषण दुर्घटनेतून बचावले. विदर्भातून येणाऱ्या बसेसची संख्या तशी कमीच असते.> या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चालकाने बसविल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर यवतमाळ येथून बुकिंग न करता मुंबई, कल्याणकडे जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडून प्रती प्रवासी सहाशे ते सातशे रुपये भाडे ठरले होते, अशीही माहिती सूत्रांनी दिली.

अहवालात नेमके काय?> ज्यावेळी बसला अपघात झाला, त्यावेळी बसमध्ये चालकासह एकूण ६० लोक होते. बसची मूळ आसन क्षमता ही ३० प्रवाशांची असून, त्यापेक्षा दुप्पट लोक बसमधून प्रवास करत होते. मृतांमध्ये दहा प्रवासी असे आहेत की त्यांनी आगाऊ बुकिंग न घेता वाटेतून या बसमधून प्रवास सुरू केला होता.> अवैध प्रवाशांना बसमध्ये असलेल्या अरुंद जागेत झोपविण्यात आले होते. बसचालकाने त्याच्या आर्थिक लोभापायी वाटेतून अतिरिक्त ३० प्रवाशांचा भरणा केला होता. बसच्या पॅसेजमध्ये बसविलेल्या प्रवाशांना बसमधून बाहेर पडता आले नाही. परिणामी बसला लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Nashikनाशिक