शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

नाशिक @ ९.४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:30 AM

मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.

नाशिक : मागील चार दिवसांपासून नाशिककरांना थंडीचा कडाका सहन करावा लागत असून, सलग दोन दिवसांपासून किमान तपमानाचा पारा ९.४ अंशावर स्थिरावला आहे. मंगळवारी (दि. २६) तपमान ९.४ अंश इतके नोंदविले गेले.  राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका मागील दोन दिवसांपासून नाशिकमध्ये जाणवत होता. मंगळवारी गोंदियामध्ये नीचांकी ८.५ इतके किमान तपमान नोंदविले गेले, तर सर्वाधिक थंडी असलेले नाशिक हे राज्यातील दुसºया क्रमांकाचे शहर ठरले. एकूणच विदर्भातील गोंदियानंतर नाशकात कडाक्याची थंडी जाणवत आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुका जास्त प्रमाणात गारठला आहे. सोमवारपासून शहराच्या किमान तपमानाचा पारा सातत्याने दहा अंशांच्या खाली राहत असून, शहरात थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिककर गारठले आहे.  मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक नीचांकी तपमानाची नोंद नाशिकमध्ये होत होती. किमान तपमानाचा पारा ९ अंशांच्या जवळपास राहत असल्यामुळे नाशिककरांना थंडीची तीव्रता अधिकच जाणवत आहे. एकूणच उत्तर भारतात आलेल्या शीतलहरीमुळे नाशिकच्या वातावरणावरही त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. वाढत्या थंडीच्या कडाक्यामुळे शहरात उबदार कपड्यांच्या वापरावर नागरिकांकडून भर दिला जात आहे. याबरोबरच शेक ोट्यांची संख्या अधिक वाढू लागली आहे. गोदाकाठासह शहराला लागून असलेल्या मळे परिसरात थंडीची तीव्रता जास्त जाणवत असल्याने संध्याकाळी ६ वाजेपासूनच या भागांमध्ये शेतकºयांकडून शेकोट्या पेटवून गप्पांचे फड रंगत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणनू प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये किमान तपमान १४ अंश इतके नोंदविले गेले आहे. यापेक्षा पाच अंशांनी कमी तपमान नाशिकमध्ये, तर गोंदियामध्ये सहा अंशांने कमी तपमान राहिले. एकूणच नाशिकसह गोंदिया जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडली आहे. पुढील काही दिवस डिसेंबरअखेरपर्यंत नाशिकमध्ये किमान तपमान दहा अंशांपेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक