शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

विधानपरिषदेसाठी नाशिकमधून नारायण राणे, भाजपाची दुहेरी खेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 2:26 PM

राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजप खेळू पाहत आहेत

ठळक मुद्देभुजबळांना देणार शह : शिवसेनेच्या वर्चस्वाला लगामस्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तुर्त तरी भाजपाची आघाडी

नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या एकतर्फी विजयाने उत्साह दुणावलेल्या भाजपाने सहा महिन्यांनी होऊ पाहणा-या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी नारायण राणे यांना पुरस्कृत करून नाशिकमधून निवडून आणण्याचा निर्णय घेतला असून, राणे यांच्या नाशिकच्या राजकारणातील प्रवेशाने तुरूंगातून सुटण्याच्या तयारीत असलेले छगन भुजबळ यांना शह देण्याबरोबरच शिवसेनेच्या राजकीय वर्चस्वाला तडा देण्याची दुहेरी खेळी भाजप खेळू पाहत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार संख्येत तुर्त तरी भाजपाने आघाडी घेतल्याने राणे यांचा विजय सुकर असल्याचे गणित त्यामागे मांडण्यात आले आहे.नारायण राणे यांनी भाजपात प्रवेश केला नसला तरी, त्यांच्या महाराष्टÑ स्वाभीमानी पक्षाने राष्टÑीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राणे यांना राज्यमंत्रीमंडळात प्रवेश देण्याची नैतिक जबाबदारी भारतीय जनता पक्षावर येवून पडली असून, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तसे वारंवार संकेतही दिले आहे. दोन दिवसांपुर्वी राणे यांनीही सांगली मुक्कामी आपला मंत्रीमंडळ प्रवेश निश्चित असल्याचे सांगितले आहे. राजकीय पातळीवर विधीमंडळाचे अधिवेशन आटोपल्यावर राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार करण्यावर भाजप-सेनेत एकमत झालेले आहे. त्यावेळी राणे यांचा प्रवेश निश्चित मानला जात आहे. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सदस्याला सहा महिन्याच्या आत विधानपरिषद वा विधानपरिषदेचे सदस्य होणे बंधनकारक आहे. अलिकडेच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राणेंना शिवसेनेच्या विरोधामुळे भाजपाकडून उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होणाºया नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेच्या जागेवर राणे यांना उमेदवारी देण्यात भाजपाला कुठलीही अडचण नसल्याचे खात्रीशीर सुत्राने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राणे यांच्या उमेदवारीमागे भाजपाने एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा मनसुबा रचला आहे. त्यात विशेष करून गेल्या २१ महिन्यापासून तुरूंगात असलेले छगन भुजबळ नजिकच्या काळात बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळ बाहेर येताच, ते पहिल्यांचा भाजपाला खिळखिळी करण्याचा प्रयत्न करतील व आपले वर्चस्व पुन्हा निर्माण करतील अशा वेळी भुजबळांइतकेच आक्रमक नेतृत्व राणे यांच्याकडे आहे. या शिवाय जिल्ह्यात शिवसेना प्रत्येक वेळी भाजपाला अडचणीत आणत असल्याने शिवसेनेला वठणीवर आणण्याची खास जबाबदारी राणे यांच्यावर सोपविली जाणार आहे. शिवाय राणे यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गंत पातळीवर कोणी विरोध करण्याची हिम्मत करणार नाही व राणेंना निवडून आणणे अगदीच सोपे होणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक