शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

गोदावरी कालव्याच्या अतिक्रमीत जागेवर पाटबंधारे खात्याचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 1:29 PM

नाशिक : गंगापूर धरणातून थेट एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नाशिक शहरांतर्गंत बांधण्यात आलेल्या गोदावरी उजवा कालव्यासाठी संपादीत करण्यात आलेल्या व सध्या अतिक्रमीत झालेल्या जागेवर पाटबंधारे खात्याचे नाव लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, या कामी जलसंपदा, भुमी अभिलेख, महसूल खात्याचे अधिकारी, कर्मचारी गेल्या ५० वर्षांचे दप्तराची शोधाशोध ...

ठळक मुद्देअतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले : ५० वर्षाचे दप्तराची चौकशी २९ किलो मीटर अंतरासाठी दोनशे हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली

नाशिक : गंगापूर धरणातून थेट एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नाशिक शहरांतर्गंत बांधण्यात आलेल्या गोदावरी उजवा कालव्यासाठी संपादीत करण्यात आलेल्या व सध्या अतिक्रमीत झालेल्या जागेवर पाटबंधारे खात्याचे नाव लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून, या कामी जलसंपदा, भुमी अभिलेख, महसूल खात्याचे अधिकारी, कर्मचारी गेल्या ५० वर्षांचे दप्तराची शोधाशोध करीत आहेत. दरम्यान, पाटबंधारे खात्याचे जमीनीवर नाव लावण्यात येत असल्याच्या वृत्ताने या जागेवर अतिक्रमण करणा-यांचे धाबे दणाणले आहे.गेल्या महिन्यात या संदर्भात नाशिक भेटीवर आलेले राज्याचे जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. जानेवारी अखेर नाशिक उजवा कालव्यावर झालेले अतिक्रमण काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्याने जलसंपदा, महसूल, भुमी अभिलेख या तिन्ही खात्याची धावपळ उडाली. गंगापूर धरणातून एकलहºयाच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी नाशिक उजवा कालव्याची बांधणी करण्यात आली होती. साधारणत: १९५० नंतर या कालव्यासाठी पाटबंधारे खात्यासाठी महसूल विभागाने जमीन संपादीत केली होती. गंगापूर, गोवर्धन, आनंदवल्ली, नाशिक शहर, उपनगर, नाशिकरोड मार्गे एकलह-यापर्यंत साधारणत: २९ किलो मीटर अंतरासाठी दोनशे हेक्टर जमीन ताब्यात घेण्यात आली व त्यासाठी जमीन मालकांना आर्थिक मोबदला देण्यात आला होता. कालव्याचे बांधकाम झाल्यानंतर साधारणत: २३ किलो मीटरपर्यंतचा कालवा महापालिकेच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला. कालांतराने गंगापूर धरणातून एकलह-यासाठी कालव्यातून पाणी सोडण्याऐवजी थेट गोदावरीतूनच पाणी सोडले जाऊ लागल्याने कालवा निरूपयोगी ठरला. या कालव्यात भर टाकून अनेक ठिकाणी बुजविण्यात आला व त्यावर बांधकामे करण्यात आली. विशेषत: नाशिक महापालिकेच्या हद्दीत हा कालवा नामशेष होऊन त्यावर इमले उभे राहिले. जमाबंदी आयुक्त चोक्कलिंगम यांनी नेमक्या याच मुद्यावर बोट ठेवून कालव्याच्या जमीनीवर जलसंपदाचे नाव लावण्याचे आदेश दिले.गेल्या महिन्यापासून जलसंपदा, भुमी अभिलेख, महसूल खात्याकडून या जमीनीच्या संपादनासाठी तयार करण्यात आलेले अवार्ड (निवाडे) शोधले जात असून, कालव्याच्या जमिनीवर गट व सर्व्हे नंबरच्या आधारे संबंधित जागेचे प्रॉपर्टी कार्ड तयार करून त्यावर जलसंपदाचे नाव लावले जात आहे. साधारणता: पन्नास वर्षापुर्वीचे दप्तर मिळणे व ते हाताळणे काहीसे कठीण असले तरी, पाटबंधारे खात्याने यात आघाडी घेतल्याची माहिती उप अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक