शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:44 IST

महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली.

- धनंजय वाखारे

नाशिक : राजकारणात कोणी छोटा अन् मोठा नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात युतीचा फॉर्म्युला सेना-भाजपाच्या रूपाने राबविला गेला आणि भाजपाला धाकला भाऊ मानत १९९५ ते २००९च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत थोरलेपण मिरवून घेणाऱ्या शिवसेनेला आता जागावाटपात सानपण घेण्याची नामुष्की ओढवली आहे, ती जनाधार टिकवून ठेवता न आल्याने. गेल्या सहा निवडणुकांकडे दृष्टिक्षेप टाकला, तर भाजपाचा मतांचा टक्का वाढत जात असताना शिवसेनेच्या जनाधारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत नाही.महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली. त्यावेळी भाजपने ११६ जागा लढत ६५ जागा जिंकल्या. भाजपाच्या २५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, तर एकूण मतांची टक्केवारी १२.८० होती. तर शिवसेनेने १६९ जागा लढत ७३ जागा जिंकल्या. सेनेच्या ६० उमेदवारांची अनामत जप्त झाली, तर मतांची टक्केवारी १६.३० टक्के होती. त्यावेळी युती पहिल्यांदा सत्तेवर आली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११७ जागा लढत ५७ ठिकाणी विजय संपादन केला. त्यावेळी भाजपाच्या पारड्यात १४.५४ टक्के मते पडली होती. शिवसेनेने १६१ जागा लढत ६९ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या २८ उमेदवारांची अनामत जप्त होऊन त्यांनी १७.३३ टक्के मते घेतली होती.

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने १११ जागांवर उमेदवारी करत ५४ जागा जिंकल्या. त्यावेळी १० उमेदवारांची अनामत जप्त होत मतांची टक्केवारी १३.६७ टक्के होती. शिवसेनेने १६३ जागा लढत ६२ जागांवर यश मिळविले. त्यांच्या १५ उमेदवारांची अनामत जप्त होऊन १९.९७ टक्के मते घेतली. २००९ च्या निवडणुकीतही युती होऊन भाजपाने ११९, तर शिवसेनेने १६० जागा लढल्या. त्यात भाजपाने ४६, तर शिवसेनेने ४४ जागा जिंकल्या. भाजपच्या पारड्यात १४.०२ टक्के तर शिवसेनेच्या पारड्यात १६.२६ टक्के मते पडली. त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने १३ जागा जिंकत ५.७१ टक्के मते घेत मोठा दणका दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आणि थोरलेपणाचे आसन डळमळण्यास सुरुवात झाली.२०१४ च्या निवडणुकीत लहान कोण, मोठा कोण? या वादात भाऊबंदकीचा अध्याय सुरू झाला अन् युती दुंभगली जाऊन भाजपा-सेना स्वतंत्र लढले. मोदी लाटेवर स्वार होत भाजपाने २६० जागा लढत तब्बल १२२ जागांवर विजय संपादन केला. त्यांच्या ४९ उमेदवारांची अनामत जप्त झाली; पण मतांच्या टक्केवारीचा आलेख १४.०२ वरून थेट २७.९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला, तर त्या तुलनेत शिवसेनेने २८२ जागा लढवत ६३ जागांवर विजय मिळविला. त्यांच्या १२९ उमेदवारांची अनामत जप्त होऊन मतांच्या टक्केवारीत ३.०९ टक्क्यांनी अल्पशी वाढ झाली. विशेष म्हणजे २००९ मध्ये ५.७१ टक्के मते घेणा-या मनसेच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊन ती ३.१५ टक्क्यांवर आली. १९९५ ते २००९ पर्यंत थोरलेपण मिरवणा-या शिवसेनेला जनाधार फारसा वाढविता आला नाही. त्या तुलनेत भाजपाने दर निवडणुकीत जनाधार वाढवत नेत २०१४ मध्ये लक्षणीय मताधिक्य प्राप्त केले. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून थोरलेपण हिसकावून घेत भाजपाने जास्त जागांवर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

बडे मियाँ बडे मियाँ...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना-भाजपा युती अभंग होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच सेना-भाजपा स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपने ४६ वरून थेट १२२ जागांवर झेप घेतली, तर शिवसेनेला ४४ वरून ६३ जागांवरच मजल मारता आली. २००९ च्या निवडणुकीतच भाजपाने आपणच थोरले असल्याची जाणीव सेनेला करून दिली होती; परंतु थोरलेपणाच्या नशेत वावरणा-या सेनेकडून ही उपाधी भाजपने २०१४ च्या निवडणुकीत हिसकावून घेतली. आता महाराष्ट्राच्या राजकारणात बडे मियाँ बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्ला... असा प्रत्यय आणून देण्यात राष्ट्रीय पक्ष असलेला भाजपा यशस्वी ठरला आहे.

निवडणुकांतील मतांची टक्केवारी

वर्ष        भाजपा          सेना

1990    10.71        15.94

1995    12.80       16.39

1999    14.54      17.33

2004    13.67      19.97

2009    14.02       16.26

2014    27.81      19.35

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक