शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

थोरलेपणाच्या सातबाऱ्यावर भाजपाचे नाव; शिवसेनेच्या वाट्याला सानपण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 16:44 IST

महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली.

- धनंजय वाखारे

नाशिक : राजकारणात कोणी छोटा अन् मोठा नसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात युतीचा फॉर्म्युला सेना-भाजपाच्या रूपाने राबविला गेला आणि भाजपाला धाकला भाऊ मानत १९९५ ते २००९च्या विधानसभा निवडणुकांपर्यंत थोरलेपण मिरवून घेणाऱ्या शिवसेनेला आता जागावाटपात सानपण घेण्याची नामुष्की ओढवली आहे, ती जनाधार टिकवून ठेवता न आल्याने. गेल्या सहा निवडणुकांकडे दृष्टिक्षेप टाकला, तर भाजपाचा मतांचा टक्का वाढत जात असताना शिवसेनेच्या जनाधारात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत नाही.महाराष्ट्रात १९९२ च्या सुमारास शिवसेना-भाजपाची युती झाली आणि १९९५ ची निवडणूक पहिल्यांदा दोघांनी एकत्र लढली. त्यावेळी भाजपने ११६ जागा लढत ६५ जागा जिंकल्या. भाजपाच्या २५ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली, तर एकूण मतांची टक्केवारी १२.८० होती. तर शिवसेनेने १६९ जागा लढत ७३ जागा जिंकल्या. सेनेच्या ६० उमेदवारांची अनामत जप्त झाली, तर मतांची टक्केवारी १६.३० टक्के होती. त्यावेळी युती पहिल्यांदा सत्तेवर आली. १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने ११७ जागा लढत ५७ ठिकाणी विजय संपादन केला. त्यावेळी भाजपाच्या पारड्यात १४.५४ टक्के मते पडली होती. शिवसेनेने १६१ जागा लढत ६९ जागा जिंकल्या होत्या. त्यांच्या २८ उमेदवारांची अनामत जप्त होऊन त्यांनी १७.३३ टक्के मते घेतली होती.

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने १११ जागांवर उमेदवारी करत ५४ जागा जिंकल्या. त्यावेळी १० उमेदवारांची अनामत जप्त होत मतांची टक्केवारी १३.६७ टक्के होती. शिवसेनेने १६३ जागा लढत ६२ जागांवर यश मिळविले. त्यांच्या १५ उमेदवारांची अनामत जप्त होऊन १९.९७ टक्के मते घेतली. २००९ च्या निवडणुकीतही युती होऊन भाजपाने ११९, तर शिवसेनेने १६० जागा लढल्या. त्यात भाजपाने ४६, तर शिवसेनेने ४४ जागा जिंकल्या. भाजपच्या पारड्यात १४.०२ टक्के तर शिवसेनेच्या पारड्यात १६.२६ टक्के मते पडली. त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेने १३ जागा जिंकत ५.७१ टक्के मते घेत मोठा दणका दिला होता. त्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेच्या मतांच्या टक्केवारीत घसरण झाली आणि थोरलेपणाचे आसन डळमळण्यास सुरुवात झाली.२०१४ च्या निवडणुकीत लहान कोण, मोठा कोण? या वादात भाऊबंदकीचा अध्याय सुरू झाला अन् युती दुंभगली जाऊन भाजपा-सेना स्वतंत्र लढले. मोदी लाटेवर स्वार होत भाजपाने २६० जागा लढत तब्बल १२२ जागांवर विजय संपादन केला. त्यांच्या ४९ उमेदवारांची अनामत जप्त झाली; पण मतांच्या टक्केवारीचा आलेख १४.०२ वरून थेट २७.९१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला, तर त्या तुलनेत शिवसेनेने २८२ जागा लढवत ६३ जागांवर विजय मिळविला. त्यांच्या १२९ उमेदवारांची अनामत जप्त होऊन मतांच्या टक्केवारीत ३.०९ टक्क्यांनी अल्पशी वाढ झाली. विशेष म्हणजे २००९ मध्ये ५.७१ टक्के मते घेणा-या मनसेच्या मतांच्या टक्केवारीतही घट होऊन ती ३.१५ टक्क्यांवर आली. १९९५ ते २००९ पर्यंत थोरलेपण मिरवणा-या शिवसेनेला जनाधार फारसा वाढविता आला नाही. त्या तुलनेत भाजपाने दर निवडणुकीत जनाधार वाढवत नेत २०१४ मध्ये लक्षणीय मताधिक्य प्राप्त केले. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून थोरलेपण हिसकावून घेत भाजपाने जास्त जागांवर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

बडे मियाँ बडे मियाँ...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असेपर्यंत शिवसेना-भाजपा युती अभंग होती. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत पहिल्यांदाच सेना-भाजपा स्वतंत्र लढले. या निवडणुकीत भाजपने ४६ वरून थेट १२२ जागांवर झेप घेतली, तर शिवसेनेला ४४ वरून ६३ जागांवरच मजल मारता आली. २००९ च्या निवडणुकीतच भाजपाने आपणच थोरले असल्याची जाणीव सेनेला करून दिली होती; परंतु थोरलेपणाच्या नशेत वावरणा-या सेनेकडून ही उपाधी भाजपने २०१४ च्या निवडणुकीत हिसकावून घेतली. आता महाराष्ट्राच्या राजकारणात बडे मियाँ बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्ला... असा प्रत्यय आणून देण्यात राष्ट्रीय पक्ष असलेला भाजपा यशस्वी ठरला आहे.

निवडणुकांतील मतांची टक्केवारी

वर्ष        भाजपा          सेना

1990    10.71        15.94

1995    12.80       16.39

1999    14.54      17.33

2004    13.67      19.97

2009    14.02       16.26

2014    27.81      19.35

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNashikनाशिक