शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

नार-पार, दमणगंगेचे पाणी महाराष्टÑातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 10:17 PM

सटाणा : नार-पार, दमणगंगेचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही,हे पाणी महाराष्टÑातच राहिल, यासाठी पुन्हा हल्लाबोल आंदोलन करू असा निर्धार करीत निष्क्रिय सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचे रविवारी (दि. १८) दुपारी सटाणा येथे आगमन झाले. त्यानिमित्त आयोजित सभेत तटकरे बोलत होते.हल्लाबोल यात्रेचा नाशिक जिल्ह्याचा समारोप होऊन यात्रा पुढे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरकडे रवाना झाली.

ठळक मुद्देसुनील तटकरे : सटाणा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चा नवापूरकडे रवानाया सरकारची बेटी पढाओ, बेटी बढाओ ही घोषणा फक्त जाहिरातीपुरती मर्यादित

सटाणा : नार-पार, दमणगंगेचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही,हे पाणी महाराष्टÑातच राहिल, यासाठी पुन्हा हल्लाबोल आंदोलन करू असा निर्धार करीत निष्क्रिय सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचे रविवारी (दि. १८) दुपारी सटाणा येथे आगमन झाले. त्यानिमित्त आयोजित सभेत तटकरे बोलत होते.हल्लाबोल यात्रेचा नाशिक जिल्ह्याचा समारोप होऊन यात्रा पुढे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरकडे रवाना झाली.देश व राज्यातील भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळे मोठी चीड निर्माण झाली आहे. हल्लाबोल मोर्चाला जनतेकडूनमिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचे द्योतक असल्याचा दावा त्यांनी केला. २०१९ च्या निवडणुकीत या फसव्या सरकारला गाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले. आपल्या भाषणात राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करत भाजपा सरकारवर तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. अच्छे दिनच्या नावाखाली भाजपाने जनतेचे मतपरिवर्तन केले; मात्र सत्ता येऊन चार वर्षे उलटली तरी अच्छे दिन हे केवळ दिवास्वप्न ठरले आहे. अजून एक वर्ष वाट पाहा, येणारे दिवस आपलेच आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास काळा पैसा आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासनदेखील हवेत विरले आहे. विजय मल्या, नीरव मोदींसारख्या कर्जबुडव्यांमुळे प्रत्येक देशवासीयावर १५ लाख रु पये कर्ज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फसवी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मराठा आणि मुस्लीम समाजाचे आरक्षण आणि वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात रस्त्यावर आली असून, जोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचा हल्लाबोल थांबणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते मुंडे यांनी दिला.आमदार दीपिका चव्हाण यांनी विकासकामांसाठी शासनाकडे तगादा लावूनही ती होत नसल्याचे सांगितले. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक कामांना प्राधान्य देऊन एकजुटीने कोणत्याही आमदारांची कामं केली जायची. मात्र भाजपा सरकार विरोधी पक्षातील आमदारांना योग्य वागणूक देत नसल्याची टीका यावेळी आमदार चव्हाण यांनी केली. राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनीही सरकारवर टीका केली.हल्लाबोल यात्रेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, जयंत पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष चित्र वाघ, संग्राम कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार दीपिका चव्हाण, पंकज भुजबळ, यतीन पगार, संजय सोनवणे, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रंजन ठाकरे, संजय चव्हाण, प्रेरणा बलकवडे, विजय वाघ, काका सोनवणे, नितीन सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नितीन सोनवणे, सनी देवरे, अमोल बच्छाव आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी केले.भारत पाकिस्तान सीमेवर सैनिक शहीद होत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख मी पाहिले आहे. दोन देशांतील प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध नाही तर चर्चा हा उपाय आहे. दुर्दैवाने आपले पंतप्रधान पाकिस्तानात जन्मदिनाचा केक खायला जातात पण तणाव मिटवण्यासाठी चर्चा करत नाहीत. डिजिटल इंडिया झालाच पाहिजे, पण त्यासोबतच लोकांच्या पोटाला अन्न मिळणंही जास्त महत्त्वाचे आहे. शेतकरी जगला तरच तो अन्न पिकवू शकेल. त्यामुळे त्याला जगवण्यासाठी सरकारने मदत ही केलीच पाहिजे. स्त्री-पुरु ष लिंग गुणोत्तरात महाराष्ट्राचा क्र मांक खाली घसरला आहे. स्त्रीभ्रूणहत्या वाढलेल्या आहेत. गुजरात मॉडेलचा गवगवा करणाºया गुजरातचा क्र मांक महाराष्ट्रापेक्षाही खाली आहे. या सरकारची बेटी पढाओ, बेटी बढाओ ही घोषणा फक्त जाहिरातीपुरती मर्यादित आहे.- सुप्रिया सुळे, खासदार