शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नाग्या-साक्याचे पाणी फक्त पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 18:33 IST

नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नांदगाव : नाग्या-साक्या धरणात मृतपाण्याचा साठा असून, ते पाणी फक्त पिण्यासाठीच वापरावयाचे असल्याने त्यात गणपती विसर्जन करू नये या जलसंपदा विभागाच्या सूचनेनुसार यंदाचे गणपती विसर्जन नाग्या साक्यामध्ये करावयाचे नाही. असा महत्त्वपूर्ण निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्ष राजेश कवडे, पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी त्याला दुजोरा देत सर्व गणेश मंडळांना आवाहन केले. सहायक पोलीस अधीक्षक रागीसुधा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या मूर्तीचे यंदा विसर्जन करू नये. प्रत्येक मंडळाने मोठ्या मूर्ती घेतल्या असतील तर सोबत अर्ध्या फुटापेक्षा छोट्या मूर्ती घ्याव्यात व त्या मूर्तींचे प्रतीकात्मक विसर्जन करावे. त्यासाठी गणेशकुंड नगरपालिका तयार करून देईल. तसेच मोठ्या मूर्ती वर्षभर जतन करण्यासाठी नगरपालिका मदत करेल, असे आवाहन केले. नगराध्यक्ष कवडे यांच्या सूचनेचे स्वागत करण्यात आले.पोलीस ठाण्यात शहरातील विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहरातील मूर्तींचे नाग्या-साक्या धरणात विसर्जन करण्याची प्रथा होती. ती यावर्षी खंडित झाली आहे. नाग्या-साक्या धरणातून जेमतेम शिलकी जलसाठ्यातून चांदवड-नांदगाव तालुक्यातील ४२ गावांच्या नळ योजनेसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती कर्मचारी नितीन धीवर यांनी या बैठकीत दिली होती. हा धागा पकडीत नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी शहरातील मंडळांच्या कार्यकर्त्यांना गणेश विसर्जन करण्यासाठी मौलिक सूचना उपस्थित कार्यकर्त्यांना केली. त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब कवडे, संतोष गुप्ता, सुमित सोनवणे, योगेश सोनार, विशाल वडघुले आदींनी विविध सूचना केल्या. गेल्या वर्षी आयोजित गणेशमूर्ती स्पर्धेचे बक्षीस वितरण सहायक पोलीस अधीक्षक रागी सुधा, नगराध्यक्ष राजेश कवडे, ज्येष्ठ नागरिक मेजर जगन्नाथ साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गणेशोत्सव काळात पालन करण्यासंबंधीच्या सूचना देताना ध्वनी पातळी ५५ ते ६० डेसिबल्स राखावी व मार्गदर्शक तत्त्वानुसार वेळ पाळण्याचे आवाहन केले. राजीव गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :WaterपाणीDamधरण