शहरं
Join us  
Trending Stories
1
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
2
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
3
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
4
४ ओव्हर्स, ७ रन्स आणि ८ विकेट्स! या गोलंदाजाने T20I मध्ये सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
5
Aadhaar Card : तुमचे 'आधार कार्ड' लॉक करा, नाही तर बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या प्रक्रिया
6
एकट्याच्या जीवावर सिनेमा करुन दाखव..., 'दृश्यम ३'च्या दिग्दर्शकाचं अक्षय खन्नाला खुलं आव्हान
7
सोन्या-चांदीच्या किंमतीबाबत बाबा वेंगानी काय म्हटलं; दरांबाबत काय केली भविष्यवाणी? जाणून घ्या
8
पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार?
9
BMC Election 2026 Shiv Sena UBT List: उद्धवसेनेकडून मुंबई महापालिकेसाठी ५५ जणांना उमेदवारी, कोणाला मिळाले एबी फॉर्म?
10
सावधान! तुमच्या नावावर भलतेच कोणी सिम वापरत नाहीये ना? 'या' पोर्टलवर घरबसल्या करा तपासणी
11
मकर राशीसाठी नवीन वर्ष 2026: जुन्या आव्हानांचा होणार अंत; प्रगतीसाठी 'हे' सूत्र वापरा आणि यश मिळवा!
12
२०२५ची शेवटची पुत्रदा एकादशी: कसे कराल व्रतपूजन?; ‘या’ गोष्टी आवर्जून करा, पुण्य-लाभ मिळेल!
13
मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांचा भाजपात प्रवेश
14
Silver Price Crash: एका तासात चांदी २१ हजार रुपयांनी आपटली; विक्रमी उच्चांकानंतर किमतीत का आला भूकंप?
15
"माझी शिवसेनेतून हकालपट्टी करा, कारण..."; KDMC च्या माजी सभागृह नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र
16
‘मोदी आणि ईव्हीएमच्या बळावर भाजपा माज करतोय, कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचंय’, राज ठाकरेंचं मोठं विधान 
17
मालेगावात महायुतीचे नेमके अडले कुठे? आता चर्चा वरिष्ठ स्तरावर; स्थानिक पातळीवर एकमत होईना
18
VHT 2025 : टीम इंडियातील 'ध्रुवतारा' चमकला! पांड्याच्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं
19
पश्चिममध्ये तीन प्रभागांत भाजप विरुद्ध भाजप! शिंदेसेना- राष्ट्रवादी एकत्र, महाविकास आघाडीचा प्रभाव
20
५ वर्षांत १०००% चं रिटर्न, आज अचानक जोरदार आपटला हा शेअर; कोणता आहे स्टॉक, कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिककर अवघ्या तासाभरात गाठणार मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:13 IST

नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी आता तीन ते साडेतीन तास वेळ लागत असला तरी आता समृद्धीमुळे नाशिककरांना हायस्पीड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

नाशिक : नाशिकहूनमुंबईला जाण्यासाठी आता तीन ते साडेतीन तास वेळ लागत असला तरी आता समृद्धीमुळे नाशिककरांना हायस्पीड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. नाशिक शहरातून इगतपुरीमार्गे नागपूर ते मुंबईसमृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी १६ किलोमीटर विशेष मार्गिका (डेडीकेटेड रोड) तयार करण्यात येणार असून, तो झाल्यानंतर नाशिककर थेट भरवीर येथून समृद्धी मार्गावर जाऊ शकतील आणि त्यामुळे मुंबई अवघ्या तासाभरात गाठता येणार आहे.नाशिकच्या रोड कनेक्टिव्हीटीला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तो मंजूर होताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्य शासनाचा नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, ५५ हजार कोटी रुपयांच्या या कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यातून हा मार्ग होणार असून त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाची परिमाणे बदलतील, परंतु नाशिक शहराच्या रोड कनेक्टिव्हीटीला आणखी एक नवा आयाम मिळणार आहे. समृद्धी मार्ग होत असताना नाशिक शहराला तो जोडण्यासाठी विशेष मार्ग असावा, अशी मागणी होत होती. डिसेंबर २०१७ मध्ये नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धीला जोडणारा मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाला आदेश दिले होेते. महामंडळाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून तसा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, तो शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.नाशिक शहरातून बाहेर पडल्यानंतर वाडीवºहे गावाजवळ असलेल्या दारणा फाटा येथून हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. अस्वली स्टेशन, साकूर, कवडदरा मार्गे भरवीर असा मार्ग असेल, तेथून तीन किलोमीटर नियमित महामार्गावरून गेल्यानंतर भरवीर इंटरचेंज येथून समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. या मार्गावर आल्यानंतर ठाणे (मुलुंड) म्हणजे मुंबईपर्यंत अवघ्या एकनिफाड ड्रायपोर्टही समृद्धीला जोडणारकेंद्र शासनाच्या वतीने महाराष्टÑात वर्धा, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ड्रायपोर्ट घोषित करण्यात आले आहे. यातील वर्धा आणि जालना हे अगोदरच समृद्धीला विशेष मार्गाद्वारे जोडण्याचे काम झाले आहे. निफाडच्या अगोदरच्या प्रस्तावात समावेश नव्हता. आता तो जोडण्यासाठी विशेष मार्ग तयार करण्याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी चर्चा करण्यात येत आहे. ड्रायपोर्टवरून कंटेनरने माल पाठविला जातो. त्यामुळे तो नियमित मार्गावरून जाण्यापेक्षा विशेष मार्गाने समृद्धीपर्यंत नेऊन पुढे त्यावरून जेएनपीटीपर्यंत कंटनेर नेता येतील.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिकMumbaiमुंबई