शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नाशिककर अवघ्या तासाभरात गाठणार मुंबई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 01:13 IST

नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी आता तीन ते साडेतीन तास वेळ लागत असला तरी आता समृद्धीमुळे नाशिककरांना हायस्पीड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे.

नाशिक : नाशिकहूनमुंबईला जाण्यासाठी आता तीन ते साडेतीन तास वेळ लागत असला तरी आता समृद्धीमुळे नाशिककरांना हायस्पीड कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. नाशिक शहरातून इगतपुरीमार्गे नागपूर ते मुंबईसमृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी १६ किलोमीटर विशेष मार्गिका (डेडीकेटेड रोड) तयार करण्यात येणार असून, तो झाल्यानंतर नाशिककर थेट भरवीर येथून समृद्धी मार्गावर जाऊ शकतील आणि त्यामुळे मुंबई अवघ्या तासाभरात गाठता येणार आहे.नाशिकच्या रोड कनेक्टिव्हीटीला अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्टÑ रस्ते विकास महामंडळाने यासंदर्भात प्रस्ताव तयार केला आहे. दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तो मंजूर होताच प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.राज्य शासनाचा नागपूर ते मुंबई समृद्धी मार्गाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, ५५ हजार कोटी रुपयांच्या या कामाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यातून हा मार्ग होणार असून त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाची परिमाणे बदलतील, परंतु नाशिक शहराच्या रोड कनेक्टिव्हीटीला आणखी एक नवा आयाम मिळणार आहे. समृद्धी मार्ग होत असताना नाशिक शहराला तो जोडण्यासाठी विशेष मार्ग असावा, अशी मागणी होत होती. डिसेंबर २०१७ मध्ये नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धीला जोडणारा मार्ग तयार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रस्ते विकास महामंडळाला आदेश दिले होेते. महामंडळाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून तसा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, तो शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे.नाशिक शहरातून बाहेर पडल्यानंतर वाडीवºहे गावाजवळ असलेल्या दारणा फाटा येथून हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. अस्वली स्टेशन, साकूर, कवडदरा मार्गे भरवीर असा मार्ग असेल, तेथून तीन किलोमीटर नियमित महामार्गावरून गेल्यानंतर भरवीर इंटरचेंज येथून समृद्धी महामार्गावर जाता येणार आहे. या मार्गावर आल्यानंतर ठाणे (मुलुंड) म्हणजे मुंबईपर्यंत अवघ्या एकनिफाड ड्रायपोर्टही समृद्धीला जोडणारकेंद्र शासनाच्या वतीने महाराष्टÑात वर्धा, जालना आणि नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ड्रायपोर्ट घोषित करण्यात आले आहे. यातील वर्धा आणि जालना हे अगोदरच समृद्धीला विशेष मार्गाद्वारे जोडण्याचे काम झाले आहे. निफाडच्या अगोदरच्या प्रस्तावात समावेश नव्हता. आता तो जोडण्यासाठी विशेष मार्ग तयार करण्याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टशी चर्चा करण्यात येत आहे. ड्रायपोर्टवरून कंटेनरने माल पाठविला जातो. त्यामुळे तो नियमित मार्गावरून जाण्यापेक्षा विशेष मार्गाने समृद्धीपर्यंत नेऊन पुढे त्यावरून जेएनपीटीपर्यंत कंटनेर नेता येतील.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गNashikनाशिकMumbaiमुंबई