शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जि.प.शाळांना महावितरणचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:51 IST

वाढीव स्थिर आकार : अनेक शाळांचा वीज पुरवठा केला खंडित

ठळक मुद्देवीज वितरण कंपनीकडून शाळांना देण्यात येणा-या मासिक बिलात स्थिर आकारच्या नावाने तब्बल ३१० रु पये वसूल केले जात आहेत

पेठ : एकीकडे वाढत्या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समित्या खिशातून पैसे खर्च करून समाज सहभागातून शाळांना सुविधा पुरवण्यासाठी धडपड करत असतांना दुसरीकडे वीज वितरण कंपनी मात्र शाळांना व्यावसायिक बिले आकारत ‘जोर का झटका’ देतांना दिसून येत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ शहरी शाळांची मक्तेदारी नसावी यासाठी शासनाने राज्यातील दऱ्याखो-यांतील शाळांचे डिजीटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला. शेकडो गावांमध्ये शिक्षक व ग्रामस्थांच्या प्रयत्नातून विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, टेलीव्हीजन यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करु न दिल्या. मात्र वीज वितरण कंपनीकडून शाळांना देण्यात येणा-या मासिक बिलात स्थिर आकारच्या नावाने तब्बल ३१० रु पये वसूल केले जात आहेत. अनेक शाळांची पटसंख्या कमी असते. शिवाय ग्रामीण भागात १२ ते १४ तास वीज गायब असते. अशा कसरतीतही शिक्षक नियोजन करु न या साहित्याचा वापर करतात. पण प्रत्यक्ष वीजेच्या कमी असतांना स्थिर आकारच्या नावाखाली दरमहा ३१० रु पये आकारले जात असल्याने कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बील भरणे मुश्किल झाले आहे. आधीच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत देण्यात येणा-या अनुदानाला कात्री लावण्यात आल्याने शिक्षकांना स्वखर्चातून बिले भरण्याची वेळ आली आहे.शाळांचा वीजपुरवठा खंडितवीजबील न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने बहुतांश शाळांचा विजपुरवठा खंडित केला असून राज्यातील हजारो शाळा केवळ बील भरले नाही म्हणून अंधारात आहेत. यामुळे प्रोजेक्टरसारख्या महागडया वस्तू धूळखात पडलेल्या दिसून येत आहेत . गत अनेक वर्षापासून राज्यातील प्राथमिक शाळांना घरगुती दराने वीज बील आकारण्याबाबत मागणी करण्यात येत असून शासन स्तरावर या मागणीला केराची टोपली दाखवण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज