शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे खासदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 00:49 IST

राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवण्याची मागणी केली.

ठळक मुद्देनिर्यातबंदी हटवा : शिष्टमंडळाने दिले निवेदन

नामपूर : राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकाऱ्यांनी धुळे मतदारसंघाचे खासदार सुभाष भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी तत्काळ हटवण्याची मागणी केली.

गेल्या आठ दिवसांपासून कांदा बाजारभाव सातत्याने घसरत आहेत. शेतकरी वर्गाने ६ महिन्यांपासून साठवलेला कांदा खराब तर होतच होता, शिवाय शासनाच्या कांदा निर्यातबंदीमुळे मागच्या महिन्यात कांदा दर खाली आले. आता नवीन पोळ कांदा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे. देशात मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत बंदी हटवून कांदा निर्यात सुरू केली नाही तर शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडेल. कांदा पिकवत असताना शेतकऱ्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. कांदा उत्पादन आता खर्चीक झाले आहे. बियाणे, रासायनिक खते, मजुरीचे दर, शेती तयार करायला लागणारे इंधनाचे दर शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे. केंद्राच्या निर्यातीबाबत धरसोड धोरणाचा तो बळी ठरत आहे. असे असताना शासनाने कांद्याला जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी किरण मोरे, दिगंबर धोंडगे, पंकज बोरसे, हर्षल अहिरे, राजेंद्र सोनवणे, मिलिंदकुमार जाधव, संदीप बागुल आदी उपस्थित होते.

 

 

खासदार सुभाष भामरे यांनी, शेतकरी वर्गाची मागणी योग्य आहे व येत्या सोमवारी दिल्लीला जाऊन पीयूष गोयल व इतर मंत्रिवर्गाची भेट घेऊन ताबडतोब निर्यात खुली करण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन अभिमन पगार यांच्या नेतृत्वाखाली भेटायला गेलेल्या शेतकरी वर्गाला दिले.

 

 

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा