शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

भटक्या, विमुक्त परिषदेचे मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 11:48 PM

राज्यातील भटक्या, विमुक्तांच्या अस्तित्वाचा लढा अजूनही सुरूच असून, या समाजाला गाव, घर, शिवार, शेत, शिक्षण नसल्यामुळे हा समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या या समाजाच्या मागण्यांकडे नियमितपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजाच्या अनेक मागण्या असून, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलजबावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालयासमोर पोतराज आंदोलन करण्यात आले.

नाशिक : राज्यातील भटक्या, विमुक्तांच्या अस्तित्वाचा लढा अजूनही सुरूच असून, या समाजाला गाव, घर, शिवार, शेत, शिक्षण नसल्यामुळे हा समाज अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या या समाजाच्या मागण्यांकडे नियमितपणे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजाच्या अनेक मागण्या असून, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची प्रभावी अंमलजबावणी करावी या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी समाजकल्याण कार्यालयासमोर पोतराज आंदोलन करण्यात आले.  भटक्या जाती व जमाती या प्रवर्गातील घटकांसाठी राज्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू करण्यात आली; मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणीच कधी झाली नसल्याने समाजातील लोक अजूनही बेघरच आहेत. सन २०११ पासून सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात २० घरांच्या तीन वस्त्या म्हणजे ६० घरे प्रत्येक जिल्ह्यात १० कोटींची तरतूद आहे; मात्र या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याने इतक्या वर्षात १२ हजार ६०० घरे होणे अपेक्षित असताना केवळ ८० घरेच बांधली गेली आहेत. त्यामुळे सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी ही प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी रतन सांगळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, बाळासाहेब नळवाडे, बापूसाहेब शिंदे, संदीप पवार, बाबूराव दौडे, गोपीनाथ क्षत्रिय, योगेश बर्वे, गिरजा चोथे, सुलोचना मोहिते, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.विविध मागण्यानाशिक, नगर, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या विभागात शासनाच्या अधिकाºयाने ही योजना आजतागायत राबविली नाही ती राबविण्यात यावी, जातप्रमाणपत्रासाठी १९६१ च्या पुराव्याची अट रद्द करावी, भटक्या, विमुक्तांसाठीचे वसतिगृह सुरू करावे, महापालिका हद्दीत मुक्त वसाहत योजना राबवावी, मेंढपाळांसाठी चराऊ कुरणे उपलब्ध करून द्यावीत, भटक्या, विमुक्तांच्या शेळ्या, मेंंढ्यांच्या निर्यातीला प्राधान्य देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकार