शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:04 IST

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती

आंदोलनात सहभागी झालेले येवला तालुक्यातील संगणक परिचालक.

 

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधान परिषदेत याप्रश्नी आवाज उठविला असता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सारवासारव करीत संगणक परिचालकांना वर्षाला ६० ते ७० हजार रुपये मिळत असल्याची माहिती मांडली. पंकजा मुंडे यांनी दिलेले उत्तर खोटे असून, संगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती संगणक परिचालक राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आझाद मैदानात येऊन संगणक परिचालकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन तसेच सर्व शिवसेना आमदार संगणक परिचालकांच्या मागण्या विधानसभेत मांडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संगणक परिचालक मोर्चात सहभागी होत कंपनी मनमानी कारभार करीत असून, संगणक परिचालक अनेक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून त्यांच्या मागण्या राज्य शासनाने तत्काळ लागू करण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. यावेळी संगणक परिचालक राज्याचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. येवला तालुक्यातील ७० हून अधिक तसेच राज्यातील हजारो संगणक परिचालक आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.संगणक परिचालकांना आयटी महामंडळात समाविष्ट करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निर्णय असून, आपले सरकार सेवा केंद्रात नवीन प्रकल्प सुरू करणार असून, संगणक परिचालकांनी या सेवातून मोबदला घ्यावा, अशी माहिती अधिवेशनात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.