शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

संगणक परिचालकांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:04 IST

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.

ठळक मुद्देसंगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती

आंदोलनात सहभागी झालेले येवला तालुक्यातील संगणक परिचालक.

 

मानोरी : येवला तालुक्यातील युवकांचा सहभागमानोरी : येवला तालुक्यासह राज्यभरात असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या राज्यातील संगणक परिचालकांचा विविध मागण्यांसाठी २७ नोव्हेंबरला सुरू असलेला मोर्चा चौथ्या दिवशीही आझाद मैदानात सुरू आहे.अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांनीही विधान परिषदेत याप्रश्नी आवाज उठविला असता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सारवासारव करीत संगणक परिचालकांना वर्षाला ६० ते ७० हजार रुपये मिळत असल्याची माहिती मांडली. पंकजा मुंडे यांनी दिलेले उत्तर खोटे असून, संगणक परिचालकांना आजपर्यंत ६०,००० रुपये मानधन मिळालेच नसल्याची माहिती संगणक परिचालक राज्याध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच आझाद मैदानात येऊन संगणक परिचालकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन तसेच सर्व शिवसेना आमदार संगणक परिचालकांच्या मागण्या विधानसभेत मांडण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संगणक परिचालक मोर्चात सहभागी होत कंपनी मनमानी कारभार करीत असून, संगणक परिचालक अनेक महिन्यांपासून मानधन मिळाले नसून त्यांच्या मागण्या राज्य शासनाने तत्काळ लागू करण्याची मागणी अजित पवार यांनी यावेळी केली. यावेळी संगणक परिचालक राज्याचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. येवला तालुक्यातील ७० हून अधिक तसेच राज्यातील हजारो संगणक परिचालक आपल्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर ठाण मांडून आहेत.संगणक परिचालकांना आयटी महामंडळात समाविष्ट करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा निर्णय असून, आपले सरकार सेवा केंद्रात नवीन प्रकल्प सुरू करणार असून, संगणक परिचालकांनी या सेवातून मोबदला घ्यावा, अशी माहिती अधिवेशनात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.