शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आई व आजीच्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:41 IST

दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील घटनाजखमी बालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार

दिंडोरी : तालुक्यातील पिंपळगाव केतकी येथे बिबट्याने तीन वर्षीय बालकावर हल्ला केला मात्र या बालकाच्या आई व आजीने मोठ्या धाडसाने बिबट्याच्या जबड्यातून बालकाची सुटका केली. या हल्लयात जखमी झालेल्या बालकावर जिल्हा रु ग्णालयात उपचार सुरु आहेत.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरूवारी सायंकाळी राहूल पंजा गायकवाड व कुटुंबीय शेतात काम करीत होते. त्यांच्यासोबत तीन वर्षाचा चेतन राहूल गायकवाड हाही खेळत होता. शेतालगत बिबट्याचे एक लहान बछडे दिसले मात्र सुरूवातीला ते मांजर असावे असे वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही वेळाने बिबट्याची मादी आली आणि तिने चेतनवर हल्ला केला. यावेळी चेतनच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याची आई व आजी यांनी धाव घेतली. आईने बिबट्यावर झेप घेत बाळाला सोडण्याचा प्रयत्न केला तर आजी अलका गायकवाड यांनी हातानेच बिबट्याला मारले. दरम्यान आरडओरडा होत असल्याने शेतकरी जमा झाले व बिबट्याने चेतनला जबड्यातून सोडत उसाच्या शेतात धूम ठोकली.जखमी झालेल्या चेतन यास तातडीने एका खासगी रु ग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले . त्यानंतर त्याला ग्रामीण रु ग्णालयात नेण्यात येऊन त्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत.आमदार नरहरी झिरवाळ यांनी ग्रामीण रु ग्णालयात जाऊन जखमी बालकाची विचारपूस करीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचाराबाबत सूचना केल्या. वनविभागाच्या अधिकाºयांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यापिंपळगाव केतकी शिवारात कादवा व कोलवण या नद्यांच्या परिसरातील उसाच्या क्षेत्रात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. पंधरा दिवसांपूर्वीच एक बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र अजूनही परिसरात बिबटे असून वारंवार मागणी करूनही त्यांचा बंदोबस्त होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे . वनविभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पिंपळगाव केतकीचे उप सरपंच विनोद देशमुख,बाजार समितीचेउप सभापती अनिल देशमुख यांनी केले आहे.आमदार नरहरी झिरवाळ यांनीही नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवित बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.यावेळी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष भास्कर भगरे ,दिंडोरीचे उपनगराध्यक्ष कैलास मवाळ,पिंपळगाव केतकीचे उपसरपंच विनोद देशमुख ,नगरसेवक माधव साळुंखे,सदाशिव गावित,राजू उफाडे,शिवाजी जाधव,प्रशांत पाटील आदि उपस्थित होते.फोटो : ०२चेतन गायकवाड

टॅग्स :forest departmentवनविभागforestजंगल