शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

भरवस्तीत धोकादायक उघडे रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:26 PM

वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

ठळक मुद्देखेडलेझुंगेवासीयांमध्ये संताप : वारंवार कळवूनही महावितरणचे दुर्लक्ष

खेडलेझुंगे : वीज वितरण कंपनीच्या देवगाव सबस्टेशनअंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रातील रोहित्रांचा बोजवारा उडाला आहे. वारंवार तक्रारी, पदाधिकारी यांनी समक्ष, फोनद्वारे केलेली कानउघडणीचाही परिणाम या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर झाल्याचे दिसून येत नाही. केवळ ग्रामीण भाग म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. उघडे रोहित्र, तुटलेल्या वीजतारा यांचा स्पर्श होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे.रूई-कोळगाव रस्त्यावर खंडेराव नरहरी गवळी यांचे वस्तीवर वीज महावितरण कंपनीचे रोहित्र (डीपी) आहे. रोडलगत असलेल्या या रोहित्राची अत्यंत बिकट परिस्थितीतून वाटचाल सुरू आहे. सदरच्या रोहित्राचे खांब तिरपे झाले आहेत. हे रोहित्र उघड्या स्वरूपात आहे. त्यावरील पत्र्याच्या पेट्या गंजून सडून गेलेली आहे. त्यामुळे त्यातील सर्व जोडणी करण्यात आलेले वायरींचे जॉइंट उघडे आहेत.फुटलेले व नादुरुस्त फ्युज त्या फ्युजमधील वाहिन्या परस्पर कनेक्शनसाठी जोडण्यात आल्या आहेत. त्यांना टेपही लावण्यात आलेला नाही किंवा विद्युतरोधक अशी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. या वस्तीवर लहान मुले, पाळीव प्राणीही आहेत. या उघड्या व धोकादायक रोहित्रांमुळे मोठा अनर्थ घडू शकतो. त्यामुळे त्याची दुरुस्ती होणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी या रोहित्राची तत्काळदुरु स्ती करून नवीन खांब बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.वीज वितरण कंपनीच्या अधिकारी-कर्मचारी यांनी याबाबत सजगता दाखवून तत्काळ परिसरातील अशा धोकादायक रोहित्रांचीमाहिती गोळा करून त्यांच्या दुरुस्तीबाबत वरिष्ठ कार्यालयास कळवून दुरु स्ती करणे गरजेचे आहे.रोडलगत असलेल्या रोहित्रांची अशी दयनीय अवस्था असून, शेतातील, झाडांच्या गर्दीत असलेल्या रोहित्रांबाबत विचार न केलेलाबरा. परिसरातील एकूण रोहित्रांपैकी नादुरुस्त रोहित्रांची संख्यानक्कीच जास्त असल्याचा अंदाज आहे.ग्रामीण भागात वीज वितरण कंपनी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व समान्य जनता यांच्याबाबत भीत भीतच माहीती देतात.ग्रामीण भागात बिबट्या, सर्प, रानडुकरांसारख्या श्वापदांमुळे हैराण असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांना जाणूबुजून रात्रीची वीज उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे शेतकरीवर्ग हैराण आहे. तरी या परिसरातील शेतकºयांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी परिसरातील नादुरु स्त रोहित्र व गंजलेल्या पेट्या, तिरपे झालेले खांब, दोन खांबामधील वीजवाहिनींचा झोल व इतर समस्यांची तत्काळ वरिष्ठ स्तरावरून पाहणी करून दुरु स्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण