शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

मृत्युदराचा वेग तिपटीने वाढला; महिनाभरात १०३ मृत्यू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 00:31 IST

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंतच्या महिनाभरात रुग्णांच्या मृत्यूचा वेग तिपटीने वाढला असून, या काळात जिल्ह्यात १०३ मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबाधितांचा आकडा अडीच हजारांकडे जिल्ह्यात कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५० पारमृत्युदराचा वेग मेच्या मध्यापासून तिप्पट

धनंजय रिसोडकर ।नाशिक : जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर्यंतच्या महिनाभरात रुग्णांच्या मृत्यूचा वेग तिपटीने वाढला असून, या काळात जिल्ह्यात १०३ मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नाशिक जिल्ह्यातील मयतांच्या संख्येत शुक्रवारी सहाने वाढ होऊन नाशिक जिल्ह्यातील एकूण मयतांची संख्या १५३ वर पोहोचली आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या बाधित आणि मृत्यू वेगाची तुलना ही राज्यातील मेट्रो सिटीबरोबर करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक महापालिका हद्दीतील पहिला मृत्यू ५ मे रोजी झाला होता. त्यानंतरच्या गत ४२ दिवसांत नाशिक महापालिकेच्या हद्दीत ५०हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. मेपासून झालेल्या मृत्यूमध्ये जवळपास निम्मे मयत हे नाशिकचे नागरिक आहेत. त्यामुळे नाशिक महापालिका प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अधिकच संभ्रमित झाली आहे. मृत्यूदराचा हा वेग कमी करण्यावरच आता आरोग्य यंत्रणेला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.गत २५ बळी चार दिवसांतजिल्ह्यातील पहिला मृत्यू ८ एप्रिलला झाल्यापासून प्रारंभीच्या २५ बळींचा टप्पा गाठला जाण्यासाठी १० मे अर्थात महिनाभराहून अधिक काळ उजाडला होता, तर त्यानंतरचा दुसरा २५ बळींचा आकडा गाठण्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी लागला. मात्र, त्यानंतर प्रत्येक २५ बळींचा टप्पा हा अवघ्या आठवडाभराच्या कालावधीत पूर्ण झालेला आहे. सव्वाशेनंतरचा २५ बळींचा टप्पा, तर अवघ्या चार दिवसांत गाठला गेला आहे. म्हणजे पहिल्या २५ बळींसाठी महिना, तर गत २५ बळी अवघ्या चार दिवसांत गेले आहेत. मृत्यूचा हा वेगच यंत्रणेसह नागरिकांच्या दृष्टीने जीवघेणा ठरत आहे.६० वर्षांवरील ५५ जणांचा समावेशमयत झालेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ५५ रुग्ण हे ६० वर्ष किंवा त्यावरील वयोगटातील आहेत. २० ते ४० या वयोगटांतील २० रुग्णांचा समावेश आहे, तर अन्य ७६ रुग्ण ४१ ते ५९ या वयोगटांतील आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मध्यमवयीन वयोगटांतील असल्याने या वयोगटातील नागरिकांना अधिक धोका आहे. सर्व मयतांमध्ये बजरंगवाडीची २० वर्षांची महिला ही सर्वाधिक अल्पवयीन होती. शहरातील ती पहिली मयत रुग्ण होती. मयतांमध्ये तब्बल ५२ महिलांचादेखील समावेश आहे. उर्वरित मयतांमध्ये १०१ पुरुषांचा समावेश आहे. महानगरात ४२ दिवसांत ५१ बळीनाशिक जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित २९ मार्चला निफाड तालुक्यातील लासलगावचा होता, तर जिल्ह्यातील पहिला कोरोनाबळी हा ८ एप्रिलला मालेगावमधून झाला होता. त्यानंतर जवळपास महिनाभरानंतर नाशिक महानगरातील पहिला कोरोनाबळी जाण्यास ५ मे उजाडला होता. तोपर्यंत नाशिक महानगरात एकाही व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झालेला नव्हता. त्यानंतर नाशिक महानगराने ५० बळींचा टप्पा अवघ्या४२ दिवसांत ओलांडला आहे. आतापर्यंत नाशिक शहरात ५१, मालेगावला ६९, नाशिक ग्रामीण २०, तर नाशिक जिल्ह्याबाहेरील दहा बळींचा समावेश आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू