शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

अभियांत्रिकीच्या निम्म्याहून अधिक जागा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:26 IST

ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे.

नाशिक : ठराविक तंत्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ होत असताना काही अभियांत्रिकी महाविद्यालयांची मात्र विद्यार्थ्यांअभावी दैना उडाली आहे. प्रवेशक्षमतेच्या ३५ टक्के ही विद्यार्थी न मिळालेल्या महाविद्यालयांची राज्यातील आकडेवाडी फुगत चाललेली असताना नाशिक विभागात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या १६ हजार ७८० पैकी ८ हजार ४२४ जागा म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या अनेक तुकड्यांमध्ये अत्यल्प विद्यार्थ्यांनी प्र्रवेश घेतल्याची शक्यता असल्याने अशा शाखा पुढील चार वर्ष सुरू ठेवण्याचे आव्हान महाविद्यालयांसमोर निर्माण होणार आहे.  अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे नियमन करणाऱ्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) निकष पाळायचे तर एका अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता आजच्या घडीला ९० ते १०० कोटी रुपये इतकी प्रचंड गुंतवणूक करावी लागते. त्यातून खर्चावर आधारित शुल्करचना असल्याने पूर्ण प्रवेश झाले तरच महाविद्यालय चालविणे संस्थाचालकांना परवडू शकते. परंतु, अनेक महाविद्यालयांमध्ये क्षमतेच्या तुलनेत ३५ ते ५० टक्के जागा भरल्या आहेत. तर काही महाविद्यालयांना एवढ्या जागा भरण्यातही यश आलेले नाही. अशा परिस्थितीत नाशिक विभागात प्रथम वर्षाच्या १६ हजार ७८० पैकी केवळ ८ हजार २६६ प्रवेश झाले असून, ८ हजार ४२४ जागा म्हणजेच निम्म्याहून अधिक जागा रिक्त आहेत. तर अभियांत्रिकी पदवीनंतर थेट द्वितीय वर्ष प्रवेशाच्या १३ हजार ९०७ जागांपैकी ७ हजार ८२३ जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ६ हजार ८४ जागा रिक्त आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी कुठे चार, कुठे आठ असे विद्यार्थी मिळाल्याने ही महाविद्यालये पुढची चार वर्षे चालणार तरी कशी असा प्रश्न  निर्माण झाला असतानाच्विद्यार्थ्यांच्या प्रवेशाअभावी विभागात विविध महाविद्यालयांमधील वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या जवळपास दीडशे तुकड्या बंद करण्यात आल्या  होत्या.३१ आॅगस्टला ‘कट आॅफ’४सध्या कोणत्या महाविद्यालयात किती प्रवेश झाले याची आकडेवारी समोर आलेली नाही. परंतु ३१ आॅगस्टला २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी प्रवेशाचा क ट आॅफ जाहीर होणार असून, त्यानंतर विभागातील किती महाविद्यालयांमध्ये किती तुकड्या चालणार आणि कोणत्या महाविद्यालयांच्या किती वर्गखोल्यांना कुलूप लावावे लागणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी