शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

पांगरीत शेतकरी संघटनेचा वीज कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2022 10:50 PM

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने पांगरी येथील शेतकरी संघटनेने वावी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेऊ नका, अशी मागणी करीत पांगरी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वावी सहायक अभियंता यांना निवेदन दिले.

ठळक मुद्देनिवेदन : वीज कनेक्शन तोडू नका, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा

पांगरी : यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसून विहिरीला असलेल्या पाण्यावर रब्बीची पिके आली आहेत. महावितरण कंपनीने वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून वसुली सुरू केली असल्याने हाती आलेले पीक वाया जाते की काय, अशी भीती निर्माण झाल्याने पांगरी येथील शेतकरी संघटनेने वावी येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हिरावून घेऊ नका, अशी मागणी करीत पांगरी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वावी सहायक अभियंता यांना निवेदन दिले.महावितरण कंपनीने थकबाकी वसुली होत नसल्याने पांगरी परिसरातील थकबाकीदारांचे रोहित्रे बंद करून बिल वसुली करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जोमात आलेली पिके पाण्याअभावी जळून जाण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेने महावितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला व तत्काळ वीजपुरवठा जोडणी करून द्यावी, अन्यथा येथील शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा निवेदानाद्वारे देण्यात आला आहे.यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आत्माराम पगार, कृष्णा घुमरे, बारकू पगार, बाबासाहेब पांगारकर, रामदास पगार, गणेश डुकरे, रामदास डुकरे, बाबासाहेब कलकत्ते, आनंदा वारुळे, सोमनाथ पांगारकर, जगन्नाथ पगार, किसन वारुळे, पुंजाहरी पगार, बबन डुकरे, सुभाष डुकरे आदींसह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.वीज वितरण कंपनीने दरवर्षी पाच हजार रुपये वीजबिल वसुली करावी तसेच महावितरण कंपनीने मागील दहा वर्षांपूर्वी जे शेतकऱ्यांना अनाठायी वीजबिल दिले आहेत ते कमी करावे.- आत्माराम पगार, तालुका अध्यक्ष, शेतकरी संघटना 

टॅग्स :electricityवीजFarmerशेतकरी