शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:18 IST

२००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींनी बुधवारी (दि़ ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़

नाशिक : २००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा च्या परीक्षार्थींनी बुधवारी (दि़ ३१) जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे़ मुख्यमंत्र्यांनी गैरमार्गाने प्रशासन सेवेत आलेल्यांवर कायमस्वरूपी निलंबनाची कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे़  शालिमार परिसरातील बी़ डी़ भालेकर मैदानापासून सुरू झालेला हा मूक मोर्चा शालिमार, एमजीरोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला़ महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील बोगस नोकरभरती उघड झाली असून, भायखळा पोलिसांनी पाच जणांना, तर विक्रीकर निरीक्षक परीक्षेत डमी उमेदवार बसविणाºया नांदेडच्या दोघांना अटकही केली आहे़ २००९ पासून सुरू असलेल्या या भरतीप्रक्रियेशी अटक करण्यात आलेल्या संशयितांचा संबंध असण्याची शक्यता असून, एकंदरीतच आयोगाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जाते आहे़राज्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया परीक्षार्थींची संख्या दहा लाखांच्या आसपास असून, प्रशासन सेवेत येण्यासाठी विद्यार्थी कठोर मेहनत घेतात; मात्र या भरतीप्रक्रियेतच जर गैरप्रकार होत असतील तर आयोगाची कार्यपद्धती व कार्यक्षमतेवरच प्रश्न निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़  राज्य लोकसेवा आयोगासोबत संधान साधून गैरमार्गाने प्रशासकीय सेवेत येणारे नागरिकांच्या समस्या कशा सोडविणार, प्रामाणिकपणे अभ्यास करणाºयांचे काय, असे अनेक सवाल परीक्षार्थींनी उपस्थित केले़ या प्रकरणाची संपर्णू  सीबीआय मार्फत चौकशी करावी तसेच गैरमार्गाने अधिकारी झालेल्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे या मागण्या करण्यात आल्या असून, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ या मोर्चामध्ये अजित देशमुख, अनुराग चिंचोरे, किरण ताडगे, ज्ञानेश्वर घोटेकर, सतीश शहाणे, योगिता कदम, उषा पवार, नेहा कोटक यांच्यासह परीक्षार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ परीक्षार्थींच्या मागण्या  नाशिकला विभागीय मुख्यालय करावे़ ,  परीक्षार्थींची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जावी ,  रद्द केल्या जाणाºया प्रश्नांचे संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावे़ , परीक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर सिस्टिम असावी़ ,  ३० टक्के कपातीची बंदी उठवावी. , सरळ सेवेतील महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, समाजकल्याण, महिला व बालविकास तसेच इतर अनुषंगिक विभागातील वर्ग ३ ते वर्ग १ ची विविध पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात यावीत.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी