शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

रीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.

पंडित महाराज कोल्हेवारीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.मला स्वत:लादेखील या गोष्टीचा अपार आनंद होत आहे. एकप्रकारचे आत्मिक समाधान लाभत आहे. सर्व वारकरी घरापासून दूर असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर जणू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे मंदिर आहे. वारीत चालताना वारकरी हे तहान-भूक विसरून चालत राहतात. कमी सुविधेमध्येही जीवन कसे जगावे हे वारी आपणाला शिकविते.स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभाव वारीमध्ये सहजपणे विसरला जातो. एकप्रकारे सर्वांमध्ये समन्वयाची भूमिका निर्माण होते. दाहीदिशा फक्त भजनाचा नाद कानावर पडत असतो. त्या आनंदामध्ये माणूस स्वत:चे अस्तित्व हरवून जातो. यावर्षी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मुक्कामी पाच वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार दरमुक्कामी वारकरी हे कार्य पार पाडीत आहेत. आकाशातून अलगद पडणारा पाऊस आणि मुखामध्ये हरिनाम याचा आनंद काही वेगळाच असतो. वारीमध्ये हा आनंद सर्व वारकºयांना हा अत्यानंद देऊन जातो. परंतु वारकºयांना पंढरपूरपर्यंत काही बाधा पोहोचू नये, यासाठी यंदा शासनाच्या वतीने निर्मल वारीच्या माध्यमातून रेनकोट वाटप करण्यात आले आहेत. परंतु वारकरी हा ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करीत नाही. वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना वारकºयांच्या मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की, आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोहमयी संसारातून घरापासून दूर वाटचाल करीत असतो़ मिळेल ते अन्नपाणी सेवन करून वारकरी दरकोस, दरमुक्कामी अखंडपणे हरिनामाचा जप करत असतो़ वारीमध्ये आसरा मिळेल तेथे थांबायचे आणि गावकरी किंवा वारीतील संयोजक देतील ते खायचे, असे त्याचे दैनंदिन कार्य असते. फक्त पुढे पुढे जायचे हाच एक ध्यास आणि उद्देश त्याच्या मनामध्ये असतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी वारकºयांच्या मनाची भावना झालेली असते.वारीत आपल्याला आचाराचा आणि विचारांचा समन्वय दिसून येतो़ अवघे धरू सुपंथ असा विचार घेऊन प्रत्येक वारकरी वारीत सहभागी झालेला असतो़ कुणाच्या हातात भगवा झेंडा तर कुणाच्या हातात टाळ-वीणा असते़ तर महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तांब्याचा कलश असते़ सर्वजण वाटचाल करताना ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करत नाहीत़ कुणाला काही अडचणी असेल तर लगेच धावून जातो आपल्या घासातील घास दुसºयाला देतो़ तसेच एकमेकाला पाणी देणे, कुणी आजारी असेल तर त्याची सेवा करणे अशी कामे करणे़ वारीमध्ये वारकरी करीत असतात़ त्याचप्रमाणे एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतात़ एकमेकांच्या समस्या जाणून सर्वांना धीर देतात़ महाराष्ट्रातील कानाकोपºयातून अनेक संतांच्या पालख्या निघतात़ त्याचबरोबर वारकºयांच्या असतात़ प्रत्येक वारकरी रोज सुमारे २० किमी पायी चालतो़ मुखी हरिनामाचा जप असल्याचा त्यांना हे अंतर पार करणे शक्य होते़ त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम वाटत नाही़ कारण त्यांचे मन आणि शरीर भक्तिमय होऊन गेलेले असते़ त्यांना फक्त विठ्ठल दर्शनाची आस लागलेली असते़ वारीमध्ये सहभागी होणारे आणि वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता अन्नदान व अन्य प्रकारची मदत करणारे हे दोन्हीही वारकरीच होत. एकंदरीत वारीचा उद्देश काय तर भगवंताची सेवा अर्थात गोरगरिबांची सेवा होय. वारी म्हणजे एकप्रकारचा आनंदाचा महासागर होय़ याठिकाणी प्रत्येकजण आपले संसारिक दु:ख बाजूला ठेवून विठू माऊलीच्या भजनात तल्लीन झालेला असतो़ भजन कीर्तनात वारकरी रात्रंदिवस दंग झालेले असतो़ असा हा वारीचा आनंद सुख सोहळा असतो़(लेखक संत निवृत्तिनाथ  समाधी संस्थानचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी