शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

मनी एक ध्यास, मनी एक आस, तुझ्या दर्शनाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:19 IST

रीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.

पंडित महाराज कोल्हेवारीमध्ये यंदा नाशिक जिल्ह्यातील सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसतो. कारण संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ मंदिर जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. शेकडो वर्षांपासून वारकऱ्यांचे डोळे या कार्यासाठी आसुसलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तिनाथ मंदिराचे स्वप्न आता साकार होत असल्याने सर्व वारीतील वारकºयांमध्ये यासंबंधी चर्चा होताना दिसते.मला स्वत:लादेखील या गोष्टीचा अपार आनंद होत आहे. एकप्रकारचे आत्मिक समाधान लाभत आहे. सर्व वारकरी घरापासून दूर असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर जणू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांचे मंदिर आहे. वारीत चालताना वारकरी हे तहान-भूक विसरून चालत राहतात. कमी सुविधेमध्येही जीवन कसे जगावे हे वारी आपणाला शिकविते.स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेदभाव वारीमध्ये सहजपणे विसरला जातो. एकप्रकारे सर्वांमध्ये समन्वयाची भूमिका निर्माण होते. दाहीदिशा फक्त भजनाचा नाद कानावर पडत असतो. त्या आनंदामध्ये माणूस स्वत:चे अस्तित्व हरवून जातो. यावर्षी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ संस्थान ट्रस्टच्या वतीने प्रत्येक मुक्कामी पाच वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार दरमुक्कामी वारकरी हे कार्य पार पाडीत आहेत. आकाशातून अलगद पडणारा पाऊस आणि मुखामध्ये हरिनाम याचा आनंद काही वेगळाच असतो. वारीमध्ये हा आनंद सर्व वारकºयांना हा अत्यानंद देऊन जातो. परंतु वारकºयांना पंढरपूरपर्यंत काही बाधा पोहोचू नये, यासाठी यंदा शासनाच्या वतीने निर्मल वारीच्या माध्यमातून रेनकोट वाटप करण्यात आले आहेत. परंतु वारकरी हा ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करीत नाही. वारीमध्ये कोणतीही सोयीसुविधा नसताना वारकºयांच्या मनाची अशी काही अवस्था होऊन जाते की, आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोहमयी संसारातून घरापासून दूर वाटचाल करीत असतो़ मिळेल ते अन्नपाणी सेवन करून वारकरी दरकोस, दरमुक्कामी अखंडपणे हरिनामाचा जप करत असतो़ वारीमध्ये आसरा मिळेल तेथे थांबायचे आणि गावकरी किंवा वारीतील संयोजक देतील ते खायचे, असे त्याचे दैनंदिन कार्य असते. फक्त पुढे पुढे जायचे हाच एक ध्यास आणि उद्देश त्याच्या मनामध्ये असतो. ‘मनी एक ध्यास, मनी एक आस तुझ्या दर्शनाची, तुझ्या चरणाची धूळ लागो माझ्या माथी’ अशी वारकºयांच्या मनाची भावना झालेली असते.वारीत आपल्याला आचाराचा आणि विचारांचा समन्वय दिसून येतो़ अवघे धरू सुपंथ असा विचार घेऊन प्रत्येक वारकरी वारीत सहभागी झालेला असतो़ कुणाच्या हातात भगवा झेंडा तर कुणाच्या हातात टाळ-वीणा असते़ तर महिला वारकºयांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, तांब्याचा कलश असते़ सर्वजण वाटचाल करताना ऊन, वारा, पाऊस याची पर्वा करत नाहीत़ कुणाला काही अडचणी असेल तर लगेच धावून जातो आपल्या घासातील घास दुसºयाला देतो़ तसेच एकमेकाला पाणी देणे, कुणी आजारी असेल तर त्याची सेवा करणे अशी कामे करणे़ वारीमध्ये वारकरी करीत असतात़ त्याचप्रमाणे एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घेतात़ एकमेकांच्या समस्या जाणून सर्वांना धीर देतात़ महाराष्ट्रातील कानाकोपºयातून अनेक संतांच्या पालख्या निघतात़ त्याचबरोबर वारकºयांच्या असतात़ प्रत्येक वारकरी रोज सुमारे २० किमी पायी चालतो़ मुखी हरिनामाचा जप असल्याचा त्यांना हे अंतर पार करणे शक्य होते़ त्यात त्यांना कोणत्याही प्रकारचे श्रम वाटत नाही़ कारण त्यांचे मन आणि शरीर भक्तिमय होऊन गेलेले असते़ त्यांना फक्त विठ्ठल दर्शनाची आस लागलेली असते़ वारीमध्ये सहभागी होणारे आणि वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता अन्नदान व अन्य प्रकारची मदत करणारे हे दोन्हीही वारकरीच होत. एकंदरीत वारीचा उद्देश काय तर भगवंताची सेवा अर्थात गोरगरिबांची सेवा होय. वारी म्हणजे एकप्रकारचा आनंदाचा महासागर होय़ याठिकाणी प्रत्येकजण आपले संसारिक दु:ख बाजूला ठेवून विठू माऊलीच्या भजनात तल्लीन झालेला असतो़ भजन कीर्तनात वारकरी रात्रंदिवस दंग झालेले असतो़ असा हा वारीचा आनंद सुख सोहळा असतो़(लेखक संत निवृत्तिनाथ  समाधी संस्थानचे अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी