शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

केद्रातील मोदी सरकार शेतकरीविरोधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 02:31 IST

बाळासाहेब थोरात : किसान बचाव आंदोलनाचा लासलगावला प्रारंभ

नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. मोदी सरकार शेतकरीविरोधी सरकार असून, उत्तर प्रदेशातील घटना-घडामोडी पाहता देशवासीयांना आता जुलमी सत्तेविरुद्ध नव्या स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार असल्याचे थोरात म्हणाले. मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बलात्कारप्रकरणी केलेली दडपशाही निंदणीय असून, योगी सरकार त्वरित बरखास्त करावे, असेही थोरात म्हणाले.

उद्योगपतींना फायदा व्हावा या हेतूने सर्वच देशात बाजार समिती व्यवस्था मोडीत काढली जात असल्याचा आरोपही थोरात यांनी केला.यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात एक कोटी शेतकरीवर्गाच्या सह्यांच्या निवेदनाचाही शुभारंभ करण्यात आला.नांदेडमध्ये बैलगाडी लाँगमार्चकेंद्र सरकारने शेतकरी विरोधीत तीन कायदे संसदेत मंजूर करून घेतल्याचे सांगत राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. नांदेडमध्ये पालकमंत्री अशोक चव्हाण, माजी खा़तुकाराम रेंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लाँगमार्च काढण्यात आला़या आंदोलनात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते़ धनदांडग्यांचे हित पाहणारे मोदी सरकार चले जाव, असे सांगा, असे चव्हाण म्हणाले.रेंगे पाटलांची सोनसाखळी लांबविलीनांदेडमधील आंदोलनात परभणीचे माजी खा़ तुकाराम रेंगे पाटील यांच्या गळ्यातील पाच तोळ्याची सोन्याची चैन चोरट्यांनी लांबविली़ चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कार्यकर्त्यांनी शोधाशोध केली परंतु चोरटा हाती लागला नाही.कोल्हापुरात ‘चले जाव - चले जाव, नरेंद्र मोदी, अमित शहा - चले जाव’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सांगलीत आंदोलनादरम्यान पेटलेला कामगार, शेतकरीच भाजपला हद्दपार करेल, असा विश्वास राज्यमंत्री विश्वजित कदम यानी बोलून दाखविला.

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरी