शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मनसे जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 01:01 IST

पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देइंजिन धावणार । १५ जागांवर सक्षम उमेदवारांसह जिंकण्याचा निर्धार

नाशिक : पुन्हा मैदानात उतरायचंय, ते जिंकण्यासाठीच! असा निर्धार व्यक्त करीत महानगरासह जिल्ह्यातील सर्व १५ जागा लढविणार असल्याचे प्रतिपादन मनसे प्रवक्ते अभिजित पानसे यांनी शनिवारी झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या गजबजलेल्या पक्ष कार्यालयातील बैठकीत मनसेचे प्रवक्ता संदीप देशपांडे, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनोज घोडके, सुजाता डेरे, अर्चना जाधव, भानुमती अहिरे आदी पदाधिकारी आणि अन्य सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीत बोलताना पानसे यांनी राज्यातील भाजप-शिवसेना सरकारवर ताशेरे ओढले.या सरकारने केवळ भूमिपूजने आणि घोषणा करण्यातच त्यांचा सगळा काळ खर्च केला. हे केवळ बोलघेवडे सरकार असून, त्यांनी सामान्यांच्या समस्यांमध्ये भर घालण्याचेच काम केले आहे. त्यामुळे या सर्व बाबी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन सांगाव्यात. त्यातूनच या सरकारच्या विरोधी जनमत तयार होणार असून, हे जनमतच निर्णायक ठरेल, असा विश्वास पानसे यांनी व्यक्त केला.बैठकीच्या प्रारंभी बोलताना देशपांडे यांनी उमेदवार कोण असेल? त्याचा विचारदेखील करू नका. तो विचार राजसाहेब यांच्याकडून केला जाऊनच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे दिलेला उमेदवार हा राजसाहेबच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना जिंकविण्यासाठीच लढा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रत्येक कार्यकर्त्याने किमान ५० ते १०० घरांमध्ये जाऊन निवडणुकीसाठी प्रचार करावा, असेही देशपांडे यांनी नमूद केले.राजगड पुन्हा बहरले२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मनसेच्या नाशिकमधील राजगड या कार्यालयाला मरगळ आली होती. त्यातच २०१७ च्या निवडणुकीत महापालिकादेखील हातून गेल्यानंतर राजगड कार्यालय तर बहुतांश वेळा ओस पडल्याचेच चित्र होते.४मात्र, मनसेने यंदाची निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर शुक्रवारपासून गजबजू लागलेले राजगड कार्यालय शनिवारी पुन्हा खऱ्या अर्थाने बहरल्याचे चित्र दिसून आले.मनसेने जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधरा जागांवर उमेदवार उभे करण्याचे जाहीर केले असले तरी नाशिक शहरी भाग वगळता अन्यत्र मनसेचे फारसे अस्तित्व नाही. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये मनसेला ताकदवान व निवडणूक जिंकण्याचे मेरिट असलेले उमेदवार मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. परंतु, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी पक्षाबाहेरीलही उमेदवार असू शकतील असे सूतोवाच केल्याने आयारामांना संधी मिळू शकते.ढिकलेंची अनुपस्थितीठरली चर्चितराजकीय वारसा लाभलेले आणि पूर्व विधानसभेतील एक इच्छुक उमेदवार असलेले राहुल ढिकले यांची या सभेला असलेली अनुपस्थिती बैठकीनंतर विशेष चर्चित ठरली. राहुल हे पक्षांतर करणार असल्याच्या चर्चांनी यामुळे पुन्हा एकदा वेग घेतला.४या मतदारसंघातील भाजपची उमेदवारी बदलण्याची चर्चा लक्षात घेता ढिकले यांनी मध्यंतरी मनसे नेते व निशाणी टाळून आपला प्रचार केल्याचे दिसून आले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेElectionनिवडणूक