मनसेला आली जाग, कामांसाठी भागम्भाग पालिकेवर धडक : मंजूर कामांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह
By Admin | Updated: May 24, 2014 00:56 IST2014-05-24T00:20:22+5:302014-05-24T00:56:27+5:30
नाशिक : महापालिकेत दोन वर्षे सत्ता भोगणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीवर नाखूश मतदारांनी लोकसभेत झटका दिल्यानंतर आता या पक्षाला नागरिकांच्या समस्यांविषयी जाग आली असून, त्यातून आज आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनात धडक मारण्यात आली. रस्ते, गटारी, घंटागाड्या अशा विविध कारणांवर कारवाईची मागणी करतानाच चुका प्रशासनाच्या परंतु दोष मात्र मनसेवर येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मनसेला आली जाग, कामांसाठी भागम्भाग पालिकेवर धडक : मंजूर कामांच्या अंमलबजावणीसाठी आग्रह
नाशिक : महापालिकेत दोन वर्षे सत्ता भोगणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगिरीवर नाखूश मतदारांनी लोकसभेत झटका दिल्यानंतर आता या पक्षाला नागरिकांच्या समस्यांविषयी जाग आली असून, त्यातून आज आमदार वसंत गिते यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांच्या दालनात धडक मारण्यात आली. रस्ते, गटारी, घंटागाड्या अशा विविध कारणांवर कारवाईची मागणी करतानाच चुका प्रशासनाच्या परंतु दोष मात्र मनसेवर येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत मनसेची महापालिकेतील कामगिरी हा महत्त्वाचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. दोन वर्षांत पालिकेत कोणतीही कामे झालेली नाहीत, अशी टीका झाली आहेत. या निवडणुकीत मनसेचे डिपॉझिट जप्त झाले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत तरी अडचणी उद्भवू नये यासाठी मनसेला आता जाग आली आहे. त्यानुसार आज धडक देण्यात आली.
आमदार गिते, महापौर ॲड. यतिन वाघ, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे आणि प्रकाश दायमा, शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि नगरसेवक यावेळी उपस्थित होते. शहरात रिलायन्स फोर-जीसाठी फोडलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत, गंगापूररोड येथे महापालिका रस्ता विकसित करीत असून, त्याठिकाणी झाडांची मुळे उघडी पडल्याने झाडे कोसळून अपघात होऊ शकतात. त्यामुळे आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. पावसाळा तोंडावर आला असताना अद्याप पावसाळापूर्व कामे सुरू झालेली नाहीत. ती त्वरित सुरू करावीत, झोपडप्यांमधील उघड्या गटारी त्वरित स्वच्छ कराव्यात. त्याचप्रमाणे घंटागाड्या आणि कचरा यांची प्रमुख समस्या असून, घंटागाड्यांची दुरवस्था झाल्याने त्या भंगारात काढून नवीन घंटागाड्या खरेदी कराव्या, यासंदर्भात ठराव करूनही अंमलबजावणी झालेली नाही ती करावी, प्रमुख रस्ते दुरुस्त करावेत, शववाहिका आणि व्हॅक्युम एम्टीयर वाहनांची खरेदी करावी, धूर फवारणीच होत नसल्याने कडक कारवाई करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी रमेश धोंगडे, यशवंत निकुळे, रूची कुंभारकर, सुरेखा भोसले, सुवर्णा मटाले, सुनीता मोटकरी यांच्यासह अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते.