शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

विधानसभेसाठी ‘मनसे फॅक्टर’ दुर्लक्षिता न येणारा

By किरण अग्रवाल | Updated: June 3, 2019 00:41 IST

लोकसभा निवडणुकीतील पराभवाने विचलित न होता, नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठीच्या विरोधकांच्या हालचाली सुरू झाल्या असून, राष्ट्रवादीचे काँग्रेसमधील विलीनीकरणाची चर्चा हा त्याचाच एक भाग ठरावा. विधानसभेच्या निवडणुकीसाठी ‘मनसे’ला सोबत घेण्याची तयारीही त्याचदृष्टीने महत्त्वाची व राजकीय समीकरणांची फेरमांडणी करावयास लावणारी आहे.

ठळक मुद्दे नाशकात विरोधकांमध्ये पराभवाची कारणमीमांसा करण्याएवढेही त्राण उरले नाही?राजकीय फेरमांडणीची गरजप्रचारात ‘व्हिडीओ साक्षी’चा नवा प्रयोग राबविणारा नेता म्हणून राज ठाकरे

सारांशलोकसभा निवडणुकीत ‘मनसे फॅक्टर’ अपेक्षेप्रमाणे उपयोगी ठरू शकला नाही हे खरे; पण म्हणून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. किंबहुना, त्यासंबंधीची यथार्थता जाणून असल्यामुळेच काँग्रेस महाआघाडीकडून त्यांना सोबत घेण्याचे संकेतही मिळत आहे. नाशिकच्या स्थानिक राजकारणात राजकीय फेरमांडणीच्या चर्चा घडून येणे त्यामुळेच स्वाभाविक ठरून गेले आहे.लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाऱ्या भाजप-शिवसेनेसाठी लाभदायक ठरल्या, तसा राज ठाकरे यांनी केलेला प्रचार काँग्रेस आघाडीकरिता उपयोगी ठरणे अपेक्षित होते. पण, तसे होऊ शकले नसले तरी राज्यात गर्दी खेचणारा (क्लाउड पुलर) व प्रचारात ‘व्हिडीओ साक्षी’चा नवा प्रयोग राबविणारा नेता म्हणून राज ठाकरे हे नाव जे अधोरेखित झाले, ते दुर्लक्षिता न येणारेच आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांची दाणादाण उडाल्याचे निकाल समोर आल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची व्यूहरचना करताना ‘मनसे फॅक्टर’ला जमेत धरणे त्यामुळेही गरजेचे बनले असावे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची त्यादृष्टीने अनुकूलता समोर आली असताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे राज यांच्या भेटीस जाऊन आल्याने, त्यांचा पक्षही याबाबत सकारात्मक राहण्याची शक्यता बळावून गेली आहे. त्यामुळे लोकसभेसाठी उमेदवार उभे न करता प्रचाराच्या रिंगणात उतरलेली ‘मनसे’, विधानसभेकरिता स्वत:चे उमेदवार घेऊन आघाडीसोबत येण्याच्या शक्यतेने प्राथमिक अवस्थेतच चर्चेचे पेव फुटून गेले आहेत.वस्तुत: लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या गर्तेतूनच अजून अनेकजण बाहेर आलेले नाहीत. केंद्र व राज्यस्तरावर बैठका होऊन पराजयाची कारणमीमांसा केली गेली असली, तरी स्थानिक पातळीवरची सामसूम ओसरलेली नाही. परंतु अशाही अवस्थेत पराभवाने खचून न जाता, पुन्हा उद्याच्या लढाईसाठी सज्ज व सिद्ध होण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, ‘मनसे’ला अधिकृतपणे सोबत घेण्याची चर्चा त्यातूनच पुढे आली आहे. तसे झाले तर कधीकाळी राज ठाकरे यांचे प्रभाव क्षेत्र राहिलेल्या नाशिकमध्ये काय घडून येईल किंवा राजकीय गणितांची कशी फेरमांडणी केली जाऊ शकेल, यासंबंधीची खलबते होणे क्रमप्राप्त ठरले आहे. अर्थात, नाशिक महापालिकेची सत्ता भूषवतानाच शहरातील तीन आमदार देणाºया ‘मनसे’ची आज पूर्वीसारखी स्थिती राहिलेली नाही हेही खरे, महापालिकेतील या पक्षाचे संख्याबळ कमालीचे घटले आहेच, शिवाय पक्ष-संघटनात्मक स्थितीही खूप सुखावह अगर प्रभावी आहे, अशातला भाग नाही. परंतु काहीच न करणाºया अगर सक्रिय न दिसणाºया अन्य विरोधकांपेक्षा ‘मनसे’ त्यातल्या त्यात बरी असे म्हणता यावे. या पक्षाच्या नेत्यांनी संपर्कातले सातत्य राखले व निश्चित कार्यक्रम हाती घेऊन पुढील वाटचाल सुरू केली तर निराशेचे ढग दूर सारण्याची अपेक्षा नक्कीच धरता येणारी आहे.महत्त्वाचे म्हणजे, आज नवी उमेद व आशा जागवून कार्यकर्त्यांना उभारी देण्याची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी त्याबाबत सुस्तच आहे. उभारीचे सोडा; पण पराभवाची कारणमीमांसादेखील त्यांच्याकडून होईनासी झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी नाशिक दौरे करून पक्ष, कार्यकर्त्यांना जनसामान्यांत जाण्याचे, त्यांचे प्रश्न हाती घेऊन सक्रियता राखण्याचे सल्ले दिले होते, मात्र तसे अपवादानेच झालेले पाहावयास मिळाले. त्यामुळे त्याच त्या नावांखेरीज व चेहऱ्यांशिवाय नवीन कुणी या पक्षात पुढे आलेलेच दिसत नाहीत. परिणामी उद्या विधानसभेची वेळ येईल तेव्हा पुन्हा तेच उमेदवार पुढे येणे क्रमप्राप्त आहे. भाजप-शिवसेनेतील विधानसभेसाठीच्या इच्छुकांनी लोकसभा लढताना स्वत:लाही प्रोजेक्ट करून घेण्याचा चाणाक्षपणा ओघाने दाखविला तसा विरोधकांमध्ये कुणी दाखवलेला दिसला नाही. त्यामुळे अमुक एका मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण, याचा विचार करायचा तर प्रबळ नावे समोर येत नाहीत. अशा स्थितीत ‘मनसे’ला नाशकातील काही जागांनी खुणावणे आश्चर्याचे वाटून घेता येऊ नये. त्यामुळेच लोकसभा निवडणूक सरली व त्यात ‘मनसे फॅक्टर’ विरोधकांच्या कामी आला नाही म्हणून त्याबाबतचे कवित्व संपले असे न होता, आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते नव्याने चर्चेत आले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना