शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मिसळबरोबरच साग्रसंगीत पार्ट्यांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:43 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ ...

नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या असल्या तरी या अशा निवडणुकांसाठी इच्छुकांना अगोदरच तयारी करावी लागते. यादृष्टीने अनेक पक्षातील इच्छुकांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. नाशिक शहरात अनेक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी करताना वाढदिवस आणि निधनाची घटना चुकवली नाही. अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून संबंधितांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना सांगून विविध समाजाच्या वतीने किंवा संस्थांच्या वतीने गुणवंताचे सत्कार किंवा मेळावा ठेवून त्याठिकाणी देखील संपर्क वाढण्याचे साधन झाले आहे. त्याचप्रमाणे देवळाली येथे तर एका इच्छुकाने गेल्या वर्षभरापासून अनेक गावात आणि वस्तीत कीर्तन सोहळे आयोजित करून प्रचार सुरू केला आहे. अर्थात, हे सर्व आयोजन-नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबाजावणीसाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. दररोज इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यापासून ते उमेदवाराबरोबर दिवसभर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून साग्रसंगीत पार्ट्या रंगू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांसाठी खास हॉटेल आणि ढाबे बुक करून त्याकडे कार्यकर्त्यांना सर्रास पाठविले जाते. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी नाश्ता पाणीदेखील उमेदवारच करीत आहेत.उमेदवारी आधीच खर्च...साधारणत: कार्यकर्त्यांना जमवून त्यांना प्रचाराला लावणे आणि पूर्णवेळ प्रचारानंतर पार्ट्या करणे हे उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रचाराला रंग चढू लागला की सुरू जाते. परंतु यंदा मात्र गेल्या वर्षभरापासूनच उमेदवारांच्या संपर्क मोहिमा सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते टिकवणे आव्हान असल्याने आतापासूनच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारांना हात सैल सोडावे लागत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक