शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मिसळबरोबरच साग्रसंगीत पार्ट्यांना ऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 01:43 IST

नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ ...

नाशिक : विधानसभा निवडणुकीची चाहुल लागल्यानंतरच सुरू झालेल्या कार्यकर्त्यांच्या मिसळ ते पार्ट्याने ऊत आला असून, सायंकाळनंतर हॉटेल्सला गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आल्याचे दिसत आहे.विधानसभा निवडणुका आता जाहीर झाल्या असल्या तरी या अशा निवडणुकांसाठी इच्छुकांना अगोदरच तयारी करावी लागते. यादृष्टीने अनेक पक्षातील इच्छुकांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून तयारी सुरू केली होती. नाशिक शहरात अनेक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी निवडणुकीची तयारी करताना वाढदिवस आणि निधनाची घटना चुकवली नाही. अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावून संबंधितांशी संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय कार्यकर्त्यांना सांगून विविध समाजाच्या वतीने किंवा संस्थांच्या वतीने गुणवंताचे सत्कार किंवा मेळावा ठेवून त्याठिकाणी देखील संपर्क वाढण्याचे साधन झाले आहे. त्याचप्रमाणे देवळाली येथे तर एका इच्छुकाने गेल्या वर्षभरापासून अनेक गावात आणि वस्तीत कीर्तन सोहळे आयोजित करून प्रचार सुरू केला आहे. अर्थात, हे सर्व आयोजन-नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबाजावणीसाठी कार्यकर्ता हा महत्त्वाचा घटक ठरला आहे. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. दररोज इच्छुक उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यापासून ते उमेदवाराबरोबर दिवसभर फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार म्हणून साग्रसंगीत पार्ट्या रंगू लागल्या आहेत. कार्यकर्त्यांसाठी खास हॉटेल आणि ढाबे बुक करून त्याकडे कार्यकर्त्यांना सर्रास पाठविले जाते. त्याचप्रमाणे सकाळच्या वेळी नाश्ता पाणीदेखील उमेदवारच करीत आहेत.उमेदवारी आधीच खर्च...साधारणत: कार्यकर्त्यांना जमवून त्यांना प्रचाराला लावणे आणि पूर्णवेळ प्रचारानंतर पार्ट्या करणे हे उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रचाराला रंग चढू लागला की सुरू जाते. परंतु यंदा मात्र गेल्या वर्षभरापासूनच उमेदवारांच्या संपर्क मोहिमा सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते टिकवणे आव्हान असल्याने आतापासूनच कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी उमेदवारांना हात सैल सोडावे लागत आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nashikनाशिक