शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘मिस्तुरा’ने रविवार झाला रंगतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:26 IST

गोदाकाठी रविवार (दि.२३)ची संध्याकाळ नाशिककरांनी आनंदात घालवली. तरुणाईने सजविलेल्या ‘मिस्तुरा’ कलामहोत्सवाला अखेरच्या दिवशी भेट देत शेकडो नागरिक येथील कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.

नाशिक : गोदाकाठी रविवार (दि.२३)ची संध्याकाळ नाशिककरांनी आनंदात घालवली. तरुणाईने सजविलेल्या ‘मिस्तुरा’ कलामहोत्सवाला अखेरच्या दिवशी भेट देत शेकडो नागरिक येथील कलाकृतींच्या प्रेमात पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. नावीन्यपूर्ण कल्पनेतून टाकाऊ वस्तूंचा लीलया वापर करत साकारलेल्या कलाकृतींसोबत तरुणाईने ‘सेल्फी’ घेत धमाल केली.  शौर्य फाउंडेशनच्या वतीने गोदापार्क येथे सालाबादप्रमाणे यावर्षीही विविध कलांचे मिश्रण ‘मिस्तुरा’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी रात्री या महोत्सवाचा समारोप करण्यात आला. शनिवारपासून सुरू असलेल्या या महोत्सवानिमित्त गोदापार्क परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘बेस्ट आऊट आॅफ वेस्ट’ ही संकल्पना घेऊन दोनदिवसीय मिस्तुरा महोत्सव तरुणाईने रंगविला.युवा कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळावे आणि प्रतिभावंत कलावंत उदयास यावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी या महोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने संध्याकाळी साडेपाच वाजेपासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तरुणाईसह अबालवृध्दांची येथे गर्दी झाली होती. ललित कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले महोत्सवाचे आकर्षक प्रवेशद्वाराने नाशिककरांचे स्वागत करत लक्ष वेधून घेतले.सोशल मीडियाची ‘क्रेझ’ तरुणाईमध्ये असल्यामुळे युवावर्गाने या महोत्सवाला मोठ्या संख्येने भेटी देत येथील कलाकृतींसोबत सेल्फी क्लिक करून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्रामवर यासंबंधीच्या पोस्ट केल्या.कव्वालीची बहारदार मैफलया महोत्सवात ‘कारवा’ ग्रुपच्या वतीने कव्वालीची मैफल रंगली. उर्दू भाषेवर विशेष प्रेम करणाऱ्या तरुणाईच्या या ग्रुपने उर्दूच्या गोडव्याने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.मुख्य गायक तन्मय उन्हवणे यांनी नुसरत फ तेअली खान यांचा ‘सादगी तो हमारी किजीये..., मेरे रश्क-ए-कमर, दमा दम मस्त कलंदर, आफ्रीन-आफ्रीन या कव्वाली सादर केल्या. त्याला गौरव गुंजाळ (तबला), ऋ तुजा काळे (संवादिनी), अरविंद नायडू, अजय भालेराव, विश्वरूप (कोरस) यांनी साथसंगत केली.‘रुद्रतांडव’ने वेधले लक्षसमारोपप्रसंगी तालरुद्रच्या ढोल-ताशा पथकाने ‘रुद्रतांडव’ नावाचे फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यामध्ये शंकरा, वृंदावनी सारंग, अहिरभैरव आदी राग सातमात्रा, साडेनऊ मात्रांमधून ढोलपथकाने सादर केले. भारतीय तसेच पाश्चात्त्य लोकवाद्याचा आधार घेतला गेला. या कार्यक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या कार्यक्रमानंतर ‘फॅशन शो’चे सादरीकरण करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक