शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:03 IST

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.

ठळक मुद्देउदासीनता : बँकेच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कंधाणे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.बागलाण तालुक्यात माहे आॅक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात फळांपिकांचाही समावेश होता. बळीराजाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला होता.बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत निधी देण्यासाठी आकस्मिक निधीतून रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय पारित करून नुकसान झालेल्या शेतकºयांनी हेक्टरी ८ हजार, व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय झाला होता. ही मदत २ हेक्टरपर्यंत लागू केली गेली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यासाठी सुधारित अनुदान अंदाजित ६२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.हा निधी तालुक्यातील एका बँकेद्वारे गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खाती वर्ग केले जात आहेत. यानुसार कंधाणेतील ४०७ खातेदारांचे ३५ लाख ३८ हजार ८४२ रुपये संबंधित बँकेकडे तहसील कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत. पण संबंधित बँकेकडून अद्यापपर्यंत सदरील रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनांचा सामना करताना दिसत आहे.सदरील मदतनिधी लवकर वितरित करण्याचा शासन आदेश असताना संबंधितांच्या वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे. संबंधित शेतकरी वर्ग मदतनिधीच्या चौकशीसाठी तहसील कार्यालय ते बँक अशी पायपीट करताना दिसत आहे.आधीच अवकाळीने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यातच तोकडी शासन मदत, त्यातही वेळकाढूपणाचे धोरण यामुळे ही मदत बळीराजासाठी मृगजळ ठरत आहे. गाठीला पैसा नाही. अवकाळी निधी वर्ग करण्यासाठी संबंधितांकडे वेळ नाही अशा चक्रात येथील बळीराजा सापडला आहे.अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यात शासनाने तोकडी मदत जाहीर केलीही पण अद्याप या निधीचा एक रु पयाही आम्हाला मिळालेला नाही. संबंधितांकडे अनेकदा चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अधिकाºयांनी याबाबत शेतकºयांना दिलासा द्यावा.- सुरेश बिरारी, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा