शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:03 IST

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.

ठळक मुद्देउदासीनता : बँकेच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कंधाणे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.बागलाण तालुक्यात माहे आॅक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात फळांपिकांचाही समावेश होता. बळीराजाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला होता.बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत निधी देण्यासाठी आकस्मिक निधीतून रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय पारित करून नुकसान झालेल्या शेतकºयांनी हेक्टरी ८ हजार, व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय झाला होता. ही मदत २ हेक्टरपर्यंत लागू केली गेली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यासाठी सुधारित अनुदान अंदाजित ६२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.हा निधी तालुक्यातील एका बँकेद्वारे गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खाती वर्ग केले जात आहेत. यानुसार कंधाणेतील ४०७ खातेदारांचे ३५ लाख ३८ हजार ८४२ रुपये संबंधित बँकेकडे तहसील कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत. पण संबंधित बँकेकडून अद्यापपर्यंत सदरील रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनांचा सामना करताना दिसत आहे.सदरील मदतनिधी लवकर वितरित करण्याचा शासन आदेश असताना संबंधितांच्या वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे. संबंधित शेतकरी वर्ग मदतनिधीच्या चौकशीसाठी तहसील कार्यालय ते बँक अशी पायपीट करताना दिसत आहे.आधीच अवकाळीने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यातच तोकडी शासन मदत, त्यातही वेळकाढूपणाचे धोरण यामुळे ही मदत बळीराजासाठी मृगजळ ठरत आहे. गाठीला पैसा नाही. अवकाळी निधी वर्ग करण्यासाठी संबंधितांकडे वेळ नाही अशा चक्रात येथील बळीराजा सापडला आहे.अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यात शासनाने तोकडी मदत जाहीर केलीही पण अद्याप या निधीचा एक रु पयाही आम्हाला मिळालेला नाही. संबंधितांकडे अनेकदा चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अधिकाºयांनी याबाबत शेतकºयांना दिलासा द्यावा.- सुरेश बिरारी, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा