शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

अवकाळी निधी ठरतोय मृगजळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 01:03 IST

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.

ठळक मुद्देउदासीनता : बँकेच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

कंधाणे : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांना शासनाकडून मदतनिधी संबंधित तालुका स्तरावर वितरितही करण्यात आली. पण अद्यापपर्यंत कंधाणेतील बळीराजांच्या खात्यावर सदरील मदतनिधीची रक्कम जमा झाली नसल्याने सुमारे ४०७ खातेदार मदतनिधीची रक्कम मृगजळ ठरू पाहात आहे. या निधीची रक्कम मिळण्याची मागणी बळीराजाकडून केली जात आहे.बागलाण तालुक्यात माहे आॅक्टोबर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात फळांपिकांचाही समावेश होता. बळीराजाला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला होता.बाधित शेतकऱ्यांना विशेष दराने मदत निधी देण्यासाठी आकस्मिक निधीतून रक्कम वितरित करण्याबाबत शासन निर्णय पारित करून नुकसान झालेल्या शेतकºयांनी हेक्टरी ८ हजार, व बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत वितरित करण्याचा निर्णय झाला होता. ही मदत २ हेक्टरपर्यंत लागू केली गेली होती. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यासाठी सुधारित अनुदान अंदाजित ६२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.हा निधी तालुक्यातील एका बँकेद्वारे गावनिहाय नुकसानग्रस्त शेतकºयांच्या खाती वर्ग केले जात आहेत. यानुसार कंधाणेतील ४०७ खातेदारांचे ३५ लाख ३८ हजार ८४२ रुपये संबंधित बँकेकडे तहसील कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत. पण संबंधित बँकेकडून अद्यापपर्यंत सदरील रक्कम संबंधित खातेदारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नसल्याचे समजते. यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनांचा सामना करताना दिसत आहे.सदरील मदतनिधी लवकर वितरित करण्याचा शासन आदेश असताना संबंधितांच्या वेळकाढू धोरणामुळे शासन निर्णयाला हरताळ फासला जात आहे. संबंधित शेतकरी वर्ग मदतनिधीच्या चौकशीसाठी तहसील कार्यालय ते बँक अशी पायपीट करताना दिसत आहे.आधीच अवकाळीने बळीराजाचे आर्थिक गणित बिघडले असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. यातच तोकडी शासन मदत, त्यातही वेळकाढूपणाचे धोरण यामुळे ही मदत बळीराजासाठी मृगजळ ठरत आहे. गाठीला पैसा नाही. अवकाळी निधी वर्ग करण्यासाठी संबंधितांकडे वेळ नाही अशा चक्रात येथील बळीराजा सापडला आहे.अवेळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला होता. यात शासनाने तोकडी मदत जाहीर केलीही पण अद्याप या निधीचा एक रु पयाही आम्हाला मिळालेला नाही. संबंधितांकडे अनेकदा चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळत नाही. अधिकाºयांनी याबाबत शेतकºयांना दिलासा द्यावा.- सुरेश बिरारी, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीMONEYपैसा