शाश्वत आनंदासाठी मन सकारात्मक असावे - स्वामी अद्वैतानंदजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:14 IST2021-05-10T04:14:17+5:302021-05-10T04:14:17+5:30
नाशिक : आनंदी रहायचे असेल तर मन सकारात्मक असावे,तरच स्वतःसह इतरांना आनंद द्याल,असा उपदेश चिन्मय आश्रमाचे स्वामी अद्वैतानंदजी यांनी ...

शाश्वत आनंदासाठी मन सकारात्मक असावे - स्वामी अद्वैतानंदजी
नाशिक : आनंदी रहायचे असेल तर मन सकारात्मक असावे,तरच स्वतःसह इतरांना आनंद द्याल,असा उपदेश चिन्मय आश्रमाचे स्वामी अद्वैतानंदजी यांनी केला.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत स्व. सदुभाऊ भोरे स्मृती व्याख्यानात ते बोलत होते. आनंदी जीवनाचा प्रवास या विषयावर स्वामी अद्वैतानंदजी यांनी नववे पुष्प गुंफले. मनुष्यास आनंद मिळतो, पण तो क्षणिक राहतो,बदलणाऱ्या जगात कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल ? परंतु आनंदी रहायचे असेल तर मन सकारात्मक असावे लागते, असेही स्वामी अद्वैतानंदजी म्हणाले. संत तुकाराम, ज्ञानोबा,रामदास स्वामी यांचा हवाला देऊन स्वामी अद्वैतानंदजी यांनी शरीराने कर्म करावे, इंद्रिये आणि मनावर तसेच वाकशक्तीवर ताबा ठेवण्याचे सूचित केले. याद्वारे जीवनात आनंद मिळू शकतो, विद्येद्वारे अन्न, वस्र, निवारा मिळेल,पण त्यातून सुख मिळेल याची शाश्वती नाही,असेही स्वामी अद्वैतानंदजी यांनी स्पष्ट केले. जगामध्ये भोग आहेत, पण त्यात दुःख अधिकच आहे. भोगे रोग भयं...म्हणूनच अध्यात्मातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संतांच्या अभंगातून सुखाची प्राप्ती मिळते. ज्यास भगवंत प्राप्ती झाली, तो सुखाचा हक्कदार आपोआपच होतो, असा आशावाद स्वामी अद्वैतानंदजी यांनी व्यक्त केला. चिन्मय मिशनचे जगभरात कार्य आहे, परंतु स्वामी चिन्मयानंदजी यांनी दोन इंच जिभेवर हे मिशन उभे केल्याचे स्वामी अद्वैतानंदजी यांनी सांगितले. श्रीमंत माणसे आनंदी असतात, हा गैरसमज आहे,धन साधन आज साध्य आहे. शरीर,इंद्रिये मन,प्राण,बुद्धी,आणि चैतन्य या सहा वस्तू देवाने दिल्यात ,त्यावर आपला अधिकार असून त्याचा चांगला उपयोग केल्यास जीवन आनंदी राहील असेही स्वामी अद्वैतानंदजी यांनी स्पष्ट केले. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले तर संगीता बाफना यांनी आभार मानले.
आजचे व्याख्यान - कवीसंमेलन
विषय - कोरोनावरील काव्य
फोटो
०९स्वामी अद्वैतानंद