शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तो उधळलेला सांड तर MIM भाजपची बी टीम, टिकैत यांची औवेसींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:20 IST

राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली

ठळक मुद्देभाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे

नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मधाळ भाषा वापरली आहे. या आंदोलनात ७५० जण मरण पावले, आंदोलकांवर १० हजार खटले भरण्यात आले आहेत. ते रद्द होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली नाही. पंतप्रधानांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर प्रहार केला. तसेच, अद्यापही हे आंदोलन सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. आता, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली. तुमच्या इथला एक उधललेला बैल तुम्ही मोकाट सोडला आहे. तो भाजपची मदत करत असून त्याला इथंच बांधून ठेवा, असे टिकैत यांनी म्हटले. टिकैत यांनी औेवेसींचे नाव न घेता, त्यांच्यावर आणि एमआयएमवर टीका केली. तो बोलतो एक आणि करतो दुसरंच. त्यामुळे, त्याची चौकशी करायला हवी, त्याला बांधून ठेवा, हैदराबाद आणि तेलंगणाच्या बाहेर जाऊ देऊ नका. जर, तो बाहेर पडला तर भाजपलाच मदत करेल, हे देशाला माहित आहे. भाजप ए आणि हा भाजपची बी टीम असल्याचा आरोपही टिकैत यांनी केला.  भाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे. भाजपला पराभूत करणे, ही संयुक्त किसान मोर्चाची भूमिका आहे. आम्ही युपीमध्ये जाऊन लोकांना सांगू, भाजपला पराभूत करण्याचं आवाहन आम्ही करू, असेही टिकैत यांनी म्हटलं.

हमी भावाचा कायदा करा

पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे का घेतले, याचे कारण आम्हाला माहिती नाही. मात्र, काही राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. किमान हमी भावासाठी कायदा करा, ही आमची मागणी कायम आहे. त्यासाठीही यापुढेही शेतकरी संघर्ष करत राहणार आहेत.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाhyderabad-pcहैदराबाद