शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तो उधळलेला सांड तर MIM भाजपची बी टीम, टिकैत यांची औवेसींवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 15:20 IST

राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली

ठळक मुद्देभाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे

नवी दिल्ली - तीन कृषी कायदे रद्द करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत मधाळ भाषा वापरली आहे. या आंदोलनात ७५० जण मरण पावले, आंदोलकांवर १० हजार खटले भरण्यात आले आहेत. ते रद्द होण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली नाही. पंतप्रधानांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांचा विश्वास नाही, असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर प्रहार केला. तसेच, अद्यापही हे आंदोलन सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. आता, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. 

राकेश टिकैत गुरुवारी हैदराबादला गेलो होते, त्यावेळी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. विशेष म्हणजे औवेसी यांना उधळलेला बैल, अशी उमपा देत बोचरी टीकाही केली. तुमच्या इथला एक उधललेला बैल तुम्ही मोकाट सोडला आहे. तो भाजपची मदत करत असून त्याला इथंच बांधून ठेवा, असे टिकैत यांनी म्हटले. टिकैत यांनी औेवेसींचे नाव न घेता, त्यांच्यावर आणि एमआयएमवर टीका केली. तो बोलतो एक आणि करतो दुसरंच. त्यामुळे, त्याची चौकशी करायला हवी, त्याला बांधून ठेवा, हैदराबाद आणि तेलंगणाच्या बाहेर जाऊ देऊ नका. जर, तो बाहेर पडला तर भाजपलाच मदत करेल, हे देशाला माहित आहे. भाजप ए आणि हा भाजपची बी टीम असल्याचा आरोपही टिकैत यांनी केला.  भाजपला जेथे पराभवाची भीती असते, तेथे औवेसींची रॅली काढण्यात येते. औवेसी हे भाजपचे चाचाजान आहेत, ते हिंदू-मुस्लीम करण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही टिकैत यांनी औवेसींवर केला आहे. भाजपला पराभूत करणे, ही संयुक्त किसान मोर्चाची भूमिका आहे. आम्ही युपीमध्ये जाऊन लोकांना सांगू, भाजपला पराभूत करण्याचं आवाहन आम्ही करू, असेही टिकैत यांनी म्हटलं.

हमी भावाचा कायदा करा

पंतप्रधान मोदी यांनी इतकीही गोड भाषा वापरू नये की ज्यापुढे मधही फिका पडेल. टीव्हीवरून घोषणा करताना मोदींनी जी मधाळ भाषा वापरली तीच त्यांनी शेतकऱ्यांशी बोलणी करतानादेखील कायम ठेवावी. तीन कृषी कायदे केंद्र सरकारने मागे का घेतले, याचे कारण आम्हाला माहिती नाही. मात्र, काही राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याची टीका होत आहे. किमान हमी भावासाठी कायदा करा, ही आमची मागणी कायम आहे. त्यासाठीही यापुढेही शेतकरी संघर्ष करत राहणार आहेत.  

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाhyderabad-pcहैदराबाद