शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

लाखो रुपयांचे रखडले मेडीक्लेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:51 AM

संजय पाठक । नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्याने लाखो रुपयांचा परतावा मिळण्यात अडचण झाली आहे. डॉक्टरांच्या विनवणीनंतरही पालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तोडगा न निघाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देचौदाशे रुग्णालये नोंदणीविना : मनपा-डॉक्टरांच्या वादात रुग्णांचे हालफटका शहरातील हजारो नागरिकांना बसला

संजय पाठक ।नाशिक : शहरातील रुग्णालयांसाठी पूर्वलक्षी पद्धतीने अग्निशमन सुरक्षिततेचे नियम लागू करण्याच्या अट्टाहासाने शहरातील सुमारे चौदाशे रुग्णालयांची नोंदणी रखडली आहे. त्याचा फटका शहरातील हजारो नागरिकांना बसला असून, उपचाराचे मेडीक्लेम मिळत नसल्याने लाखो रुपयांचा परतावा मिळण्यात अडचण झाली आहे. डॉक्टरांच्या विनवणीनंतरही पालिकेकडून गेल्या पाच वर्षांत तोडगा न निघाल्याने हा पेच निर्माण झाला आहे.नाशिक शहरात सुमारे पंधराशे खासगी रुग्णालये आहेत. त्यात दररोज हजारो रुग्ण उपचार घेत असतात. उपचारासाठी एकूणच होणारा खर्च लक्षात घेता आता बहुतांशी नागरिकांचा मेडीक्लेम (आरोग्य विमा) काढलेला असतो. साहजिकच उपचार घेताना रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक मेडीक्लेमच्या मिळणाºया रकमेवरूनच नियोजन करतात. काही प्रकरणात क्लेम थेट रुग्णालयांना मिळतो किंवा काही प्रकरणात रुग्णांना मिळत असतो. शासकीय कर्मचाºयांच्या बाबतीत हा खर्च बिले सादर केल्यानंतर परताव्याच्या स्वरूपात मिळत असतो. सामान्यत: मेडीक्लेमचे अर्ज भरत असताना त्यात संबंधित रुग्णालयाचा महापालिकेतील नोंदणी क्रमांक आवश्यक असतो. त्याशिवाय क्लेम सेटल होत नाही आणि रक्कम मिळत नाही.नाशिक महापालिका आणि शहरातील हॉस्पिटल यांच्यातील नव्या नियमावरून नोंदणीचा निर्माण झालेला प्रश्न हा पाच वर्षांपूर्वीचा असून, तो अद्याप सुटलेला नाही. मेडीक्लेमचे अर्ज भरताना यापूर्वी हॉस्पिटलच्या नूतनीकरण केलेल्या नोंदणीचा क्रमांक नसला तरी नोंदणी क्रमांकासाठी सादर केलेल्या अर्जाच्या आधारे मेडीक्लेम मिळत होते. गेल्या महिन्यात इन्शुरन्स रेग्युलटरी अ‍ॅँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीने एक आदेश संकेतस्थळावर जारी केला आहे. त्यासाठी मेडीक्लेमसाठी मुंबई नर्सिंग अ‍ॅक्टनुसार स्थानिक प्राधिकरणाकडे रुग्णालयाची नोंदणी आवश्यक केली आहे. नाशिक महापालिका आणि शहरातील हॉस्पिटल यांच्यातील नव्या नियमावरून नोंदणीचा निर्माण झालेला प्रश्न हा पाच वर्षांपूर्वीचा असून, तो अद्याप सुटलेला नाही. काय आहे अडचणकेंद्र आणि राज्य सरकारने रुग्णालयांसाठी अग्निशमन सुरक्षा नियमावली केली आहे. रुग्णालयांची नोंदणी महापालिकेकडे करताना किंवा नोंदणीचे नूतनीकरण करताना वैद्यकीय विभागाला अग्निशमक दलाच्या ना हरकत दाखल्याची प्रत द्यावी लागते. परंतु अग्निशमन सुरक्षिततेचे नियम जाचक असून, सदरचे नियम लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या रुग्णालयांना सुरक्षा व्यवस्था करणे शक्य नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाकडून नोंदणीचे नूतनीकरण केले जात असून, त्याचा फटका रुग्णालयांना पर्यायाने रुग्णांनाही बसत आहे.