शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

कांदा सडू लागल्यामुळे लाखो रु पयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:19 PM

आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

देवळा : आठवडाभरापूर्वी देवळा तालुक्यात झालेल्या पावसामुळे बाजरी तसेच नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे व कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. चाळीत साठवणूक केलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडू लागल्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गत दोन वर्षांंपासून तोट्यात जाणाºया उन्हाळी कांद्याला यावर्षी बºयापैकी बाजारभाव असल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला होता. मोठ्या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. परंतु कांद्याच्या बाजारभावातील अस्थिरतेमुळे चाळीतील उन्हाळी कांदा विकण्यासंदर्भात शेतकरी संभ्रमात पडले होते. त्यातच सोशल मीडियावर कांद्याच्या बाजारभावासंदर्भात दररोज येणाºया वेगवेगळ्या पोस्टमुळे शेतकºयांच्या अपेक्षा वाढून तर संभ्रम अधिकच वाढला. अनेक शेतकºयांना कांदा विक्री करण्यासंदर्भात निश्चित निर्णय घेता आला नाही. मोठ्या अपेक्षेने चाळीत साठवणूक केलेला कांदा आता सडू लागला असून, काही शेतकºयांचा चाळीतील कांदा संपूर्ण सडल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा सडू लागल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आता चाळीत साठवणुक केलेला कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस आणू लागल्यामुळे बाजारात कांद्याची आवक वाढू लागली आहे.पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकर्यांनी रब्बी हंगामासाठी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले होते. पावसामुळे हि रोपे खराब झाली असुन ह्या शेतकर्यांना पुन्हा उन्हाळी कांद्याचे बियाणे उपलब्ध करावे लागणार आसल्याने त्यांना भुर्दंड बसणार आहे.तालुक्यातील सर्व नद्या नाल्यांना पाणी वाहत असुन एखादा अपवाद सोडला तर सर्व धरणे व पाझरतलाव पाण्याने ओव्हर फ्लो झाली आहेत. चणकापूूर उजव्या कालव्याला सोडलेल्या पुर पाण्यामुळे तालुक्याला चांगला लाभ झाला आहे. विहीरीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. रब्बी हंंगामासाठी शेतकर्यांना पाण्याची उपलब्धता झाली आहे.