शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घरपट्टीतील गोंधळ आता प्रशासनच निस्तरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:00 IST

महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले

नाशिक : महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले असून, आता ही प्रकरणे प्रशासनच निस्तरणार आहे. विशेषत: अनेक प्रकरणांत सर्वेक्षणातील गोंधळ झालेला असेल तर प्रशासन हे करदात्याला सुनावणीला न बोलविताच दुरुस्ती करून घेणार आहे. त्यामुळे हजारो करदात्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केला आहे.  महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणांतर्गत ६२ हजार मिळकतींना घरपट्टीच लागू नसल्याचे आढळले होते. त्यानंतर महापालिकेने अशा इमारतींना नोटिसा देण्याचा धडाका सुरू केला असून, आत्तापर्यंत ४२ हजार नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा करण्यात आल्या असून,  त्या सुधारित दराने या नोटिसा पाठविण्यात आल्याने अनेक मिळकतधारकांना लाखो रुपयांच्या दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदरच्या नोटिसा बजावतानाच सदोष सर्वेक्षण झाल्याचेदेखील आढळत आहे.  ज्या इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळाला आहे त्यांनादेखील बेकायदेशीर ठरवणे, चुकीचे क्षेत्रफळ नोंदवणे यांसारखे अनेक प्रकार घडले आहेत. काही ठिकाणी तर सर्वेक्षणाला कोणीच न जाताही चुकीचे क्षेत्रफळ दाखवून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांत मोठ्या आर्थिक दहशतीचे वातावरण असून, जमेल त्या पद्धतीने नागरिक हरकती घेत आहेत. महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा हजार हरकती आणि सूचना आत्तापर्यंत प्राप्त झाल्या आहेत.  महापालिकेने दिलेल्या नोटिसांमध्ये गोंधळ आढळत असून, पूर्णत्वाचा दाखला देऊनही महापालिकेने त्या अनधिकृत ठरवल्या आहेत. लाकडी वाड्यांना आरसीसी दाखवण्यात आले आहे. या प्रकारामुळे आता महापालिकेत आलेल्या हरकतींची दखल घेऊन योग्य त्या सुधारणा करण्यात येतील, तसेच काही ठिकाणी महापालिकेच्या लक्षात आल्यानंतरदेखील करासंदर्भातील सुधारणा करून घेण्यात येतील म्हणजेच संबंधित नागरिकांना नोटिसा पाठवण्याऐवजी प्रशासनच प्रकरणांची छाननी करून उचित कार्यवाही करेल, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.घरपट्टीची जबाबदारी मिळकतधारकाचीचमहापालिकेच्या वतीने घरपट्टी वसुलीसाठी नोटिसा देताना अनेकदा नागरिक महापालिकेच्या जबाबदारीचे स्मरण करून देतात. विशेषत: नगररचना विभागाच्या वतीने पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर त्याची एक प्रत घरपट्टी विभागाला दिली जात असते. मात्र कोणत्याही नव्या सदनिकेत वास्तव्यासाठी गेल्यानंतर संबंधित नागरिकानेच महापालिकेला पंधरा दिवसांत घरपट्टी लागू करण्याची विनंती करणे आवश्यक असते, असे आयुक्तांनी सांगितले.महापालिकेकडे आलेल्या हरकती आणि सूचनांच्या आधारे कर उपआयुक्त सुनावणी घेणार असून, त्यामाध्यमातूनही नागरिकांना कर दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहेच, परंतु अनेक ठिकाणी प्रशासनच स्वत:च पुढाकार घेऊन सुधारित आदेश देतील, असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे आता नागरिकांना मोठा कर दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTaxकरNashikनाशिक