शरद जोशी यांच्या आठवणी कळवणकरांनी जागवल्या
By Admin | Updated: December 12, 2015 23:05 IST2015-12-12T23:03:29+5:302015-12-12T23:05:28+5:30
शरद जोशी यांच्या आठवणी कळवणकरांनी जागवल्या

शरद जोशी यांच्या आठवणी कळवणकरांनी जागवल्या
कळवण : शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे संस्थापक, माजी खासदार शरद जोशी यांच्या दु:खद निधनाने कळवण तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या समवेत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करणाऱ्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अनेक आठवणींना उजाळा देऊन त्यांच्या स्मृती जागवल्या.
व्यक्तिस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारातील सरकारी हस्तक्षेप कमी करणे अशी त्यांची भूमिका कळवण तालुक्यातील अनेक शेतकरीपुत्रांना भावली. शरद जोशींनी १९७९ मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केल्यानंतर कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात शेतकरी संघटनेचे वारे वाहू लागले. कळवण तालुका शेतकरी संघटनेचे केंद्रबिंदू ठरले. संघटनेच्या आंदोलनाची सूत्रे कळवण तालुक्यातून हलवली गेली. १९७९ पासून ‘शेतमालास रास्त भाव’ या एककलमी कार्यक्रम राबविल्याने कसमादे पट्ट्यात वसाकाचे संस्थापक उपाध्यक्ष स्वर्गीय साहेबराव देशमुख, वसाकाचे संस्थापक संचालक स्वर्गीय हंसराज पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रामचंद्र बापू पाटील, माजी आमदार शांताराम आहेर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास पवार, वसाकाचे माजी उपाध्यक्ष शांताराम जाधव, फुला जाधव, धर्मा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कृष्णा पवार, तालुकाध्यक्ष रत्नाकर गांगुर्डे, सखाराम वाघ, कळवण बाजार समितीचे माजी सभापती देवराम कृष्णा पगार, नवीबेजचे माजी सरपंच चंद्रकांत पवार, अशोक पवार, बाजीराव शिंदे, जगन्नाथ पाटील, भास्कर गुंजाळ, कारभारी वाघ, दिलीप कुलकर्णी, सुकदेव बर्वे आदिंसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शेतकरी संघटनेची धुरा हातात घेऊन संघटनेचा झंझावात वाढवून कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आक्र मक भूमिका घेतली.
कसमादे पट्ट्यात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली कांदा, ऊस पिकांच्या संदर्भात झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची आठवण आजही शेतकऱ्यांच्या स्मरणात
आहे.(वार्ताहर)