शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

बागलाण पंचायत समितीमध्ये  सभापतींसह सदस्यांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:50 IST

बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला.

सटाणा : बागलाण पंचायत समितीमध्ये जनहिताची कामे होत नाहीत तसेच महत्त्वाची माहिती सदस्यांपासून दडवली जाते. याला गटविकास अधिकारीच जबाबदार असून, त्यांच्यावर निष्क्रि यतेचा ठपका ठेवत सभापतींसह सदस्यांनी सभात्याग केला. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रभारी गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.  दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी पाटील कार्यालयीन काळात कधीच येत नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेची कामे रखडली आहेत. त्यामुळे त्यांचा कार्यभार काढून पूर्णवेळ गटविकास अधिकारी देण्यात यावा या मागणीसाठी सर्व पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन साकडे घालण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.  येथील पंचायत समितीच्या सभागृहात सभापती विमल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी मागील सभेतील तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांची माहिती सादर करण्याची मागणी गटविकास अधिकाºयांकडे केली होती. मात्र प्रभारी गटविकास अधिकारी पाटील यांनी माहिती देण्यास असमर्थता दाखिवल्याने अधिकारी व पदाधिकाºयांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी संतप्त पदाधिकाºयांनी थेट गटविकास अधिकारी पाटील यांना आरोपीच्या पिंजºयात बसविण्याचा प्रयत्न केला. निष्क्रिय गटविकास अधिकाºयामुळे तालुक्यातील जनहिताची कामे रखडल्याचा आरोप केला. गटविकास अधिकाºयाचा वचक नसल्यामुळेच खातेप्रमुख दांड्या मारतात. वनविभाग, तालुका कृषी अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज महावितरण कंपनी, आगार व्यवस्थापक, लागवड अधिकारी, स्थानिकस्तर आदी महत्त्वाच्या खातेप्रमुखांनी दांडी मारल्याचे आढळून आले.याला गटविकास अधिकारी पाटील यांनाच जबाबदार धरत संतप्त पदाधिकाºयांनी सभात्याग केला. यावेळी सभापती सोनवणे यांच्यासह उपसभापती शीतल कोर, गटनेते अतुल अहिरे, माणिक अहिरे, सुनीता अहिरे, वसंत पवार, वैशाली महाजन, कान्हू अहिरे, संजय जोपळे आदीं सदस्यांनी सभात्याग केला.गटविकास अधिकारी येतात सुटी झाल्यावरदेवळ्याचे गटविकास अधिकारी महेश पाटील यांच्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून बागलाणचा अतिरिक्त पदभार आहे. मात्र सहा महिन्यात पाटील कधीच कार्यालयीन वेळेवर आले नसल्याचे गटनेते अतुल अहिरे यांनी निदर्शनास आणून दिले. ते सायंकाळी ५ वाजता येतात. कार्यालयीन वेळेत येत नसल्यामुळे तालुक्यातून आलेल्या जनतेची कोणतीही कामे होत नाहीत. पदाधिकाºयांनादेखील पंधरा पंधरा दिवस गटविकास अधिकारी पाटील येत नाहीत. यामुळे जनहीताची कामे होत नाहीत. बैल व शेळी गोठ्याची प्रकरणे रखडली आहेत.शौचालय बांधकामांची बिलेदेखील प्रलंबित आहेत. अशा निष्क्रि य अधिकाºयाचा पदभार काढून घ्यावा व त्यांच्या ठिकाणी पूर्णवेळ गटविकास अधिकाºयाची नेमणूक करावी या मागणीसाठी आपण जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याचे अहिरे यांनी सांगितले.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती